मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने अमराठी व्यापाऱ्यांच्या गुर्मीविरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी होण्याआधीच मला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मोर्चात येण्यासाठी माझा जीव कासावीस झाला होता. सरकारी दबावापुढे न झुकता पोलिसांनी परवानगी दिली असती तर आजचा मोर्चा ५० हजार लोकांचा झाला असता, असे अविनाथ जाधव म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली.
advertisement
इथला आमदार भिकारडा, मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही
इथला भिकारडा आमदार म्हणतो की मीरा भाईंदरमध्ये १२ ते १५ टक्के लोक मराठी आहेत. मला त्याला सांगायचंय की इथे १५ टक्के असो की १८ टक्के.... आता मराठी माणूस तुझे राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही. त्याने आता मराठी माणसांच्या नादाला लागू नये, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर हल्ला चढवला.
तर असेच अमराठी लोकांचे मोर्चे निघाले असते...
आज जर आपला मोर्चा निघाला नसता तर गेल्या आठवड्यात जसा अमराठी लोकांनी मोर्चा काढला, तसे पुढेही मोर्चे निघाले असते. परंतु मराठीची शक्ती बघितल्यानंतर आता कुणाची हिम्मत होणार नाही, असे अविनाश जाधव म्हणाले.
जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा
पोलिसांचे आभार मानतो. तुमच्यामुळे ताकद एकत्र झाली, सरकारच्या विरोधात असेज जात जा. आम्ही एकजूट होऊ. जे कुणी पोलीस दोषी असतील त्यांना निलंबित करा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर अविनाश जाधव यांनी दिली.
