राणी बागेत वाघाचा रहस्यमय मृत्यू
भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात शक्ती वाघ 2020मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलेला होता. तो वेळी हा वाघ साडेतीन वर्षांचा होता आणि आता तो दहा वर्षांचा होता. या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्याची माहिती मिळत असली तरी वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस लपवली असल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून योग्य ती देखभाल झाली नसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
दहा वर्षांचा असलेल्या या वाघाची आता पूर्ण वाढ झालेली होती. या उद्यानात प्रशासनाने नैसर्गिक अधिवास केला होता ज्यात तो राहत होता. शिवाय या वाघाला खाण्यासाठी मांसाहारही देण्यात येत होते शिवाय मुबलक पाणी, बसण्यासाठी-विहार करण्यासाठी ठिक-ठिक ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोहत दुसरा वाघ जय आणि वाघीण करिश्माही होते. परंतू 17 नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
8 दिवसं गप्प का बसलं राणी बाग प्रशासन?
भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी हे दावा केला आहे की,‘शक्ती’ वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्यामुळे झालेला आहे. एवढचं नाही तर ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती ही कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला सविस्तर माहिती देणे आवश्यक होती. मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती.
एवंढचं म्हणजे मृत्यू जाहीर करण्याआधी वाघाची विल्हेवाट कशी लावली आणि पोस्टमॉर्टम 24 तास देखरेखीखाली केले का, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शक्तीचा मृत्यू 17 नोव्हेंबरला झाला पण माहिती मात्र आठ दिवसांनी दिली. त्यामुळे आमदार अजय चौधरी यांनी चौकशीची मागणी केली आहे. नमुने नागपुरला पाठवले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
