दानवे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी दाखवावे, असं थेट आव्हान निंबाळकर यांनी दिलं आहे. शिवाय महिला डॉक्टरच्या मृत्यूला राजकीय रंग देऊ नये, असं म्हटलं. यानंतर अंबादास दानवे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाशी त्यांचा कसा संबंध आहे, हेही पुराव्यासह दाखवलं आहे. शिवाय या प्रकरणात डीवायएसपी राहुल धस आणि पीआय अनिल महाडिक यांचा काय संबंध आहे? हे तपास अधिकाऱ्यांनी सांगावं, अन्यथा मला हेही उघड करावं लागेल, असं थेट चॅलेंज दानवे यांनी दिलं.
advertisement
अंबादास दानवे ट्विटमध्ये नक्की काय म्हणाले?
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील, ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पाहा....
1. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला, असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक २१ ते ३१ यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.
2. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला 'फिट' देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे' असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.
3. दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.
4. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे!
आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पीआय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल. बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच.
