या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या (20 ऑगस्ट) एक दिवसाची सुट्टी राहणार आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक आणि दळणवळणात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो, याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नद्या-ओढ्यांवरील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूरप्रवण भागातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
पालघरमध्ये शाळा बंद...
पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. उद्या देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय.
