पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, 2013 साली समाधान यांचा विवाह सारिकाशी झाला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सारिकाचे शेखरशी प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधाची माहिती समाधान व त्यांची आई विमल यांना होती. त्यामुळे घरात सतत वाद होत होते. सारिका आणि शेखर यांनी सासू विमल यांचा काटा काढण्याचा कट केला.
advertisement
सासूला मारण्याचा कट
10 जानेवारी 2026 रोजी सकाळी शेखरने सारिकाला गावाबाहेरील शेतात बोलावून विषारी औषधाची बाटली दिली. सासूला संपवण्यासाठी रात्री आठच्या सुमारास सारिकाने घरातील पाण्याच्या कळशीत विषारी औषध मिसळले. हे पाणी सासू विमल यांनी तांब्यात घेतले; मात्र चव कडू लागल्याने त्यांनी ते न पिता तांब्या तसाच ठेवून दिला.
समाधानचा जीव गेला
जेवणानंतर अनभिज्ञ असलेल्या समाधानने तेच पाणी पिले. काही तासांतच त्यांना तीव्र उलट्या व अस्वस्थता जाणवू लागली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र 16 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाणे करत असून, महिन्यानंतर उघडकीस आलेल्या या विषारी कटाने परिसरात खळबळ उडाली आहे.






