कोकणात पाठवण्यात येणार ज्यादा गाड्या
यावर्षी कोकणात खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, देवरुख आणि रत्नागिरी या भागात बसेस जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय दूर होणार आहे आणि तसेच विभागाला मोठ्या फायदा होणार आहे. तसेच या काळात मार्गतपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा विभागातून मुंबई-ठाण्यासाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून 260 बस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक 2 बसमधून एक कंडक्टर पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.
advertisement
प्रवाशांची संख्या विचारात घेऊन निर्णय
गणेशोत्सव असल्यामुळे कोकणातील चाकरमान्यांची गाडी जाण्यासाठी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे एसटी विभागाकडून गणेशोत्सवातील मुख्य कालावधी आणि परतीचा प्रवास याचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील प्रवाशांची संख्या विचारात घेऊन बसेस पाठवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा : Ganpati Aarti : बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही करताय 'या' चुका, 99% लोकांना माहितीच नाही
हे ही वाचा : Yavatmal News: ग्रामपंचायत फोडली, कागदपत्रं जाळली; ग्रामसभेपूर्वीच 'या' गावात उघडकीस आला कांड!