शीळ रस्त्यावरच्या देसाई गावातला तलाव नागरिकांनी स्वच्छ केलाय. हा तलाव जलपर्णीने भरलेला होता त्यामुळे तलावातील पाणी दिसेनासे झाले होते. आगरी समाज प्रतिष्ठान आणि डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा तलाव साफ करण्यात आला. गावातली तरुण मुलं या मोहिमेत सहभागी झाली होती. जलपर्णी काढल्यानंतर त्वचेला प्रचंड वेदना होत असून औषधोपचार करावे लागले, अशी माहिती या तरूणांनी दिली.
advertisement
किरकोळ दुकानदारांची भन्नाट आयडिया देणार मॉलला टक्कर, ग्राहकांना होणार फायदा
गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होत आहे. गावकऱ्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे तलावांचे जतन करण्यासाठी आणखी तरुण मुले पुढे सरसावतील आणि सर्वांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
OMG! करवंटीपासून बनवली बुलेट, अशा भन्नाट वस्तूंचा Video तुम्ही कधी पहिला नसेल
ठाणे महापालिका कचरा उचलत नसल्याचा आरोप गावकरी करत असून गेल्या आठवड्यात काढलेल्या जलपर्णीचा कचरा अद्यापही पालिकेने उचलला नाही अशी माहिती गावकरी देत आहेत. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.





