या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडणार आहे. विशेषतः शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गट बॅकफुटला जाताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच होणार आहे. या प्रवेशासाठी भाजपमधील स्थानिक नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पहिल्यांदाच आमदार झालेले देवेंद्र कोटे यांची भूमिका या सर्व घडामोडींमध्ये निर्णायक ठरली असल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे राष्ट्रवादीतील प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.
advertisement
बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. या नेत्यांचा त्यांच्या मतदारसंघात असलेला प्रभाव पाहता, भाजपला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी ताकद मिळणार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.