उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पालिकेची निवडणूक तुम्ही लावा, मुंबईच्या रस्त्याची चाळण झााली आहे. जरा कुठे पाऊस झाला तर मुंबई तुंबत आहे. मोनो रेल लटकत आहे, लोक खड्ड्यात जात आहे. बोटी का सुरू करत नााही? ही लोक भाजपचाचा महापौर झाला पाहिजे, असं सांगत आहे. ही लोक आता हिंदू -मुस्लमान वाद पेटवत आहे. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, माणुसकी हाच माझा धर्म आहे.
advertisement
उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
जे भाजपवाले अंगावर येत आहे, तुम्ही मुंबई जिंकली तर अदानीच्या पायावर समर्पण कराला, जाणवं घालाल. एक व्यापारी म्हणून तुम्ही मुंबईकडे पाहत आहात, आम्हाला हिंदूत्व शिकवू नका, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका. भगवा फक्त शिवसेनेच्या हातात आहे. तुमच्या फडक्यवरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्या अंगावर या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते अमित साटम?
उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर 'खान' मुंबईचा महापौर होईल. ठाकरेंची शिवसेना खान महापौर करेल पण भाजप ते होऊ देणार नाही. मुंबईवर हिरवे संकट आले आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल