भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांनी निवडणुकांच्या काळात विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे. केंद्राच्या राजकारणातील विनोद तावडे यांचे वाढते वजन पाहता ते भाजपचे महाराष्ट्रातील नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा अनेकदा रंगते. दिल्लीच्या राजकारणात राहून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी जवळीक निर्माण केलेले विनोद तावडे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये पाठवले जाईल, असे अनेकांकडून सांगितले जाते.
advertisement
तुमचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत! विनोद तावडे म्हणाले...
यावर विनोद तावडे म्हणाले, भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ज्याचे नाव जास्तीत जास्त चर्चेत असते, तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. भाजपने इतर राज्यात चर्चेत नसलेले अनेक नवखे मुख्यमंत्री दिले आहेत, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीनंतर नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे सूचित केले.
महायुती सरकारच्या योजनांचा तावडेंनी पाढा वाचला
तावडे म्हणाले, विधानसभेच्या प्रचार सुरू झाला. महायुतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचा लाभ करून दिला आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, अशा प्रकल्पातून पायाभूत विकास करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना विजबील माफी, विद्यार्थ्यांना १० हजार लाभ, महिलांसाठी उज्ज्वला योजना, अशा लोकहिताच्या योजना महायुतीने राबविल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.
गेल्या १० वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही
ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा डान्सबार मधून खंडणी घेतली. उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब लावले, याची आठवण आम्ही जनतेला करून देणार आहोत. १० वर्ष केंद्रात मोदी सरकार आहे. विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही, असेही तावडे म्हणाले.
