खरं तर रमाबाई अपार्टमेंटमध्ये एकूण 50 सदनिका आहेत. त्यापैकी अंदाजे 12 सदनिका कोसळल्या होत्या. या सदनिका शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ पुर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि अनेक रहिवासी मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सूरू होते.या दरम्यान काल उशिरा पर्यंत 15 मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. य़ानंतर आज पुन्हा दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
advertisement
या दुर्घटनेत आतापर्यंत आरोही ओंकार जोवील (24 वय),उत्कर्षा जोवील (1 वय), लक्ष्मण किसकु सिंग (26 वय),दिनेश प्रकाश सकपाळ (43 वय),सुप्रिया निवळकर (38 वय),अर्णव निवळकर (11वय), पार्वती सकपाळ (60वय),दिपेश सोनी (41 वय),सचिन निवळकर (40वय),हरिश सिंग बिष्ट (34 वय),सोनाली रुपेश तेजाम (41वय),दिपक सिंग बोहरा (25वय),कशिश पवन सहेनी (35 वय),शुभांगी पवन सहेनी (40 वय),गोविंद सिंग रावत(28 वय), ओंकार जोवील (27 वर्ष, रोहिणी चव्हाण (37 वर्ष) अशी 17 मृतांची नावे आहेत.तर आणखी दोघांची ओळख पटली नाही आहे.
तसेच या दुर्घटनेत 9 जण जखमी आहेत. जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४) यांचा समावेश असून, त्यांच्यावर वसई, नालासोपारा व विरार येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, ६ जणांवर उपचार सुरू आहेत.
मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत
विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. 48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे.
