मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील दोषमुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराडने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे व न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेत अपीलात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला
खंडपीठाकडे यानंतर कराडच्या वकिलांनी अपील मागे घेण्याची विनंती केली. खंडपीठाने परवानगी दिल्यानंतर अपील मागे घेण्यात आले. खंडपीठाने याचिका निकाली काढली. वाल्मिक कराडने अंबाजोगाई सत्र न्यायालयात सादर केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. याविरोधात दाखल अपीलात शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आले.
advertisement
अपिलात दुरूस्ती अर्ज सादर करण्याची विनंती
अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने कराडने आपल्या अपिलात दुरूस्ती अर्ज सादर करण्याची विनंती केली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो, असा युक्तिवाद शासनातर्फे करण्यात आला. त्यामुळे वाल्मीक कराडचे अपील फेटाळण्यात यावे अशीही विनंती करण्यात आली. वाल्मिक कराडच्या वतीने अॅड. नीलेश घाणेकर, तर शासनातर्फें मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे आणि अॅड. पवन लखोटीया यांनी सुनावणीत काम पाहिले
