TRENDING:

Sunil Kedar : 'सरकार आल्यावर पहिला देशद्रोहाचा गुन्हा जिल्हाधिकाऱ्यावर' काँग्रेस नेत्याचा इशारा

Last Updated:

Sunil Kedar : माझे सरकार आल्यावर वर्धा जिल्हाधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : वर्ध्याच्या शेतकरी धरणे आंदोलनात माजी मंत्री सुनील केदार यांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर चांगलाच संताप व्यक्त केला. आपण पालकमंत्री असताना सेवाग्रामच्या देखभालीसाठी केलेल्या व्यवस्थेलाच बंद केल्याचा आरोप करून आपले सरकार आल्यावर या जिल्हाधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे वक्तव्य वर्ध्याचे माजी पालकमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. वर्ध्याच्या गांधी चौक येथे संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी धरणे आंदोलन सुरू आहे, त्यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री सुनील केदार
माजी मंत्री सुनील केदार
advertisement

आमचं सरकार विधानसभेत येणारच आहे, सरकार आल्यावर पहिला देशद्रोहाचा गुन्हा वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर करणार आहे. त्याचं कारण सांगतो, सेवाग्राममध्ये विकास केल्यावर तेथील वास्तूची देखभाल - दुरुस्ती साठी एक व्यवस्था करून ठेवली होती, मी गेल्यावर ही व्यवस्थाच कलेक्टरने बंद केली. राष्ट्रपित्याबद्धल देखील अनादर आहे. याच्यावर तर गुन्हा दाखल करणार आहे. ज्या व्यक्तीच्या भरवशावर देश स्वतंत्र झाला, त्या संबंधी आपण आदर ठेऊ शकत नाही, प्रशासकीय अधिकारी आदर ठेऊ शकत नाही? कसले अधिकारी आहेत हे? देश स्वतंत्र झाला नसता तर हा अधिकारी आयएएस झाला असता का? हा देखील वखर घेऊन भर्र.. भुर्र करत शेतात गेला असता, असा टोलाही सुनिल केदार यांनी लगावला.

advertisement

वाचा - अजितदादांंच्या टीकेला कोल्हेंचं 3 प्रश्नांमध्ये उत्तर; शिरूरमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

बँक घोटाळ्यात सुनिल केदारांना जामीन मंजूर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

काही दिवसांपूर्वी एनडीसीसी बँकेतील घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सुनील केदार यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनील केदार यांना 22 डिसेंबरला पाच वर्षांची शिक्षा तसेच 12.5 लाखांचा दंड ठोठावला होता. 28 डिसेंबरपासून सुनील केदार हे तुरुंगात होते. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तीस डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आता केदार यांच्या वतीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. अखेर आज न्यायालयाने केदार यांना दिलासा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Sunil Kedar : 'सरकार आल्यावर पहिला देशद्रोहाचा गुन्हा जिल्हाधिकाऱ्यावर' काँग्रेस नेत्याचा इशारा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल