TRENDING:

घड्याळापासून ते ब्लड ग्रुपपर्यंत! अजित पवारांबद्दलच्या ९ खास गोष्टी, ज्या तुम्हालाही माहीत नसतील

Last Updated:

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, धडाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड जाईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, धडाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड जाईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. ‘दादा’ म्हणून लाखो कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मनात घर करून राहिलेले अजित पवार यांनी बारामतीत अखेरचा श्वास घेतला. निवडणुकीच्या रणांगणात कधीही न हार मानणारे अजित पवार एका दुर्दैवी अपघातात जनतेपासून कायमचे दूर गेले. त्यांच्या अकाली निधनामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar
advertisement

बारामतीचा बुलंद आवाज शांत झाला

अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे नऊ वेळा प्रतिनिधित्व करणारे नेते होते. एकदा लोकसभेत तर सलग आठ वेळा विधानसभेत त्यांनी विजय मिळवला. बारामतीचा विकास हा शरद पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्या नावाशीही जोडला जातो. पाणी, शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांनी ठोस कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

advertisement

१) कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य

अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुले पार्थ आणि जय पवार हे आहेत. नुकतेच गेल्या डिसेंबरमध्ये मुलाचे लग्न झाले होते. राजकीय जीवनात व्यस्त असतानाही कुटुंबाशी असलेले नाते त्यांनी कायम जपले.

२) चार मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव असे नेते ठरले, ज्यांनी चार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी जवळपास दहा वर्षे हे पद भूषवले, जो एक विक्रम मानला जातो.

advertisement

३) घड्याळाची ओळख आणि राष्ट्रवादीशी नाते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आजीवन निष्ठा राखणारे अजित पवार ‘घड्याळ’ या चिन्हाशी कायम जोडले गेले. महागड्या घड्याळांची त्यांना आवड होती. दुर्दैवाने, अपघातानंतर त्यांची ओळख घड्याळावरूनच पटवावी लागली, ही बाब अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली.

४) धर्मनिरपेक्ष आणि विकासाभिमुख भूमिका

अजित पवार यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर ते ठाम भूमिका घेत आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम राखत.

advertisement

५) स्पष्टवक्तेपणा आणि थेट शैली

स्पष्ट बोलणे हीच त्यांची ओळख होती. मनातले थेट बोलण्याची त्यांची शैली अनेकदा वादग्रस्त ठरली, पण त्याच शैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. वेगळ्या राजकीय वाटा निवडल्या तरी शरद पवार यांच्याशी असलेले नाते त्यांनी कधीही तोडले नाही.

६) नोकरशाहीवर मजबूत पकड

प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णयक्षमता यामुळेच ते प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात. राज्याच्या समस्या, आर्थिक गणिते आणि विकासाच्या गरजा यांची त्यांना सखोल जाण होती.

advertisement

७) पहाटे सुरू होणारे कामकाज

अजित पवार हे ‘सकाळी पाच वाजता काम सुरू करणारे’ नेते म्हणून प्रसिद्ध होते. थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणे, तक्रारी ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेणे, ही त्यांची कार्यपद्धत होती. पिंपरी-चिंचवडच्या विकासातही त्यांचे योगदान लक्षणीय राहिले.

८) आरएसएस मुख्यालयापासून अंतर राखले

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपशी जुळवून घेतल्यानंतरही अजित पवार यांनी तत्वे आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयापासून अंतर राखले. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते रेशमबागला गेले नाहीत. शाहू, आंबेडकर आणि फुले यांच्या पुरोगामी विचारांवर ते ठाम राहिले.

९) वेगळा रक्तगट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच जिंकत असत, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचा रक्तगट वेगळा होता. ते A (पॉझिटिव्ह) रक्तगटाचे होते. असे म्हटले जाते की या रक्तगटाच्या लोकांमध्ये संतुलित व्यक्तिमत्व आणि स्वभाव असतो. शिवाय, या रक्तगटाच्या लोकांमध्ये नेतृत्वगुण देखील असतात. A+ रक्तगटाचे लोक संवेदनशील आणि दयाळू असतात. असं वैज्ञानिक दृष्ट्या सांगितले जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबई-गोवा महामार्गावर वाढले अपघात, इंजिनिअर तरुणानं केलं असं, सगळीकडे चर्चा, V
सर्व पहा

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक, अनुभवी आणि निर्णायक आवाज शांत झाला आहे. ‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा हा नेता आता केवळ आठवणींत उरला असला, तरी त्यांच्या कार्याचा ठसा राज्याच्या राजकारणावर कायम राहणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घड्याळापासून ते ब्लड ग्रुपपर्यंत! अजित पवारांबद्दलच्या ९ खास गोष्टी, ज्या तुम्हालाही माहीत नसतील
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल