TRENDING:

IAS Anjali Ramesh Transfer : हळदीसाठी संस्था, ग्रामपंचायतींना विशेष ओळख, ८ महिन्यात अंजली रमेश यांचं जबरदस्त काम

Last Updated:

Who Is IAS Anjali Ramesh: हिंगोली जिल्ह्यात आयएएस अंजली रमेश यांनी केवळ सात महिने काम केले. त्यांच्या उल्लेखनीय कामाची जिल्ह्यात होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली : महाराष्ट्र सरकारला स्थापन होऊन जवळपास एक वर्षे झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात अतिशय वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होतात, हा जणू पायंडा पडला आहे. मंगळवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांचा समावेश आहे.
अंजली रमेश
अंजली रमेश
advertisement

आयएएस अंजली रमेश यांनी एप्रिल महिन्यात हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतली होती. मात्र केवळ सात महिन्यांच्या कार्यकाळात अंजली रमेश यांनी अनेकांच्या डोळ्यात भरणारे काम हिंगोली जिल्ह्यात करून दाखवले. त्यांची बदली छत्रपती संभाजी नगर येथे मृदा आणि जलसंधारण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

आयएएस अंजली रमेश यांनी केलेली उल्लेखनीय कामे

advertisement

१) हिंगोली जिल्हा हा हळदीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. हेच लक्षात घेऊन अंजली रमेश यांनी जिल्ह्यात टर्मेक्स हळद नावाने महिला शेतकऱ्यांची संस्था स्थापन केली. भविष्यात या संस्थेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

२) अंजली रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच रंगाने रंगविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना बसण्याची सोय तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. तसेच सूचना फलकावर उपलब्ध सेवांची माहिती द्यावी, असा आदेशही अंजली रमेश यांनी काढला होता.

advertisement

३) अंजली रमेश यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन गुणवत्ता तपासणी केली. तसेच आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सुविधांची पाहणी केली.

४) जिल्हा परिषदे अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या भरतीचा रखडलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

५) पशुसंवर्धन विभागातील गैरव्यवहारावर तडफदार पद्धतीने कारवाई करून दोषी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

६) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोरगरीब लोकांना हक्काचे घर देणाऱ्या घरकुल योजनेसंबंधात लक्ष घालून तसेच पंचायत समिती कार्यालयांना वेळोवेळी भेटी देऊन गरजूंना लाभ देण्याच्या सूचना केल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Anjali Ramesh Transfer : हळदीसाठी संस्था, ग्रामपंचायतींना विशेष ओळख, ८ महिन्यात अंजली रमेश यांचं जबरदस्त काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल