केळी लावगडीकडे पाठ
गेल्या काही काळात बीडमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे खरीप पिके संकटात आली असून पिकांनी माना टाकल्या आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी हवालदील आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी फळबागांची लागवडही रखडली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिना संपला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे केळीची लागवड शेतकऱ्यांनी टाळली आहे. मे आणि जून महिन्यात केळीचे रोपे उपलब्ध होत नव्हती मात्र जुलै, ऑगस्टमध्ये रोपे उपलब्ध झाली. मात्र, आता पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरवली आहे, असे शाहीर यांनी सांगितले.
advertisement
दुष्काळाच्या सावटातील शेतकऱ्यांना फटका, 'या' फळाच्या उत्पन्नात होणार घट!
शेतकऱ्यांकडून मागणी नाही
पावसाअभावी मागणी नसल्याने केळीच्या नव्या लागवडी रखडल्या आहेत. राज्यातील विविध टिशू कल्चर लॅबमधील सुमारे अडीच ते तीन कोटी रोपे लागवडी विना पडून आहेत. येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही तर राज्यातील केळी लागवड मोठ्या प्रमाणात धोक्यावर येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
पावसानं दडी मारल्यानं पिकांनी टाकल्या माना, हतबल बळीराजची कळकळीची मागणी
गतवर्षी गारपीटमुळे नुकसान
मागील वर्षी तोडणीला आलेले केळीची पीक गारपीटीमध्ये मोठ्या संकटात सापडले. त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान न भरून निघण्याइतके झाले. यामुळे यंदा केळी लागवड करून फायदा होईल का तोटा या विचारात शेतकरी आहे. बाजारात 14 ते 22 रुपये प्रति डझन केळाला दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी केळी लागवडीकडे वळला होता. मात्र आता दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांना दिसून आलीय. त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी केळी लागवड करण्यासाठीची उदासीनता असल्याचे चित्र आहे.