कशी झाली सुरुवात?
जालना जिल्ह्यातील वाटुर मंठा रोडवर अजिंक्य गूळ उद्योग नावाने हा गूळ निर्मिती प्रकल्प आहे. मंठा येथील रहिवासी असलेले बाबुराव शहाणे यांनी 2018 मध्ये या गुऱ्हाळाची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या स्तरावरती गूळ निर्मिती केली जायची. मात्र ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी तब्बल दहा चिमण्या आणि तीस कढ्या असलेल्या या अवाढव्य गूळ निर्मिती प्रकल्पाची आखणी केली. सध्या या गुऱ्हाळ वर दिवसाला दोनशे ते सव्वा 200 क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते.
advertisement
दीडशे मजूर गूळ निर्मितीसाठी तर जवळपास अडीचशे मजूर ऊस तोडणी साठी असे एकूण 400 मजूर शहाणे यांच्याकडे काम करतात. अस्सल गावरान पद्धतीने म्हणजेच भेंडीचे पाणी टाकून मळी काढण्याची पद्धत या ठिकाणी वापरली जाते. यामुळे गूळ हा चवीला अतिशय उत्तम असतो. या गुळाला गुजरात राज्यामध्ये मोठी मागणी आहे असल्याचे बाबूराव शहाणे यांनी सांगितले.
दुष्काळात सुरू केली गोशाळा, जालन्यातील कुटुंबाची अनोखी गोसेवा
मी 2018 मध्ये गावरान पद्धतीचा गूळ तयार करण्यास सुरुवात केली. हा प्लांट अतिशय छोटा होता लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे हा मोठा प्लांट सुरू केला. अतिशय उत्तम क्वालिटीचा गावरान पद्धतीचा गूळ इथे तयार होतो. या गुळाला गुजरातमध्ये भाव देखील जास्त मिळतो. आणि मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आपले गुऱ्हाळ मराठवाड्यातील सगळ्यात मोठं गुऱ्हाळ आहे, असं बाबुराव शहाणे यांनी सांगितलं.