तिकीट दरामध्ये दरवाढ
रेल्वे मंत्रालयाने 2020 नंतर प्रवासी भाड्यांत वाढ जाहीर केली आहे. 1 जुलैपासून नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी प्रवास दरात 1 पैसे प्रति किलोमीटर तर एसी प्रवासासाठी 2 पैसे प्रति किलोमीटर दरवाढ होणार आहे. 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी मात्र दर जैसे थे राहणार आहेत. मासिक पास (MST) आणि शॉर्ट डिस्टन्स प्रवासावर याचा परिणाम होणार नाही. मात्र 500 किमीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी किलोमीटरमागे एक पैशांची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
Fastag Update: FASTag मध्ये मोठा बदल! टोलसोबत पार्किंग, EV चार्जिंग आणि विम्यासाठीही लवकरच नवा नियम
तात्काळ बुकिंगसाठी आधार सक्ती
तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अट घालण्यात आली आहे. 1 जुलैपासून IRCTC अॅप किंवा वेबसाइटवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन अनिवार्य असणार आहे. याचा थेट परिणाम अचानक प्रवास करणाऱ्या, गरजूंवर होणार आहे. तात्काळ तिकीटसाठी धावपळ करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे फटका बसू शकतो. तात्काळ विंडो तिकीटासाठी देखील ओरिजनल आधार कार्ड दाखवणं आणि ओटीपी देणं बंधनकारक असणार आहे.
OTP शिवाय बुक होणार नाही तिकीट
तात्काळ बुकिंग प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा बदल 15 जुलैपासून लागू होईल. आता प्रत्येक तात्काळ बुकिंगवेळी आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर एक OTP ऑथेंटिकेशन सक्तीचं असणार आहे. OTP दिल्यानंतरच तिकीट बुक होणार आहे. याचा अर्थ, प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी मोबाइलवर येणाऱ्या OTP द्वारे आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. अन्यथा तिकीट बुक होणार नाही.
FASTag Rs 3000 Annual Pass : FASTag पास घ्यावा की नाही? तुमच्या मानतल्या 7 प्रश्नांची थेट उत्तरं
बुकिंग एजंटांवरही निर्बंध
तात्काळ बुकिंग सुरु होण्याच्या पहिल्या 30 मिनिटांत कोणताही एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. AC क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30, तर नॉन-AC साठी 11 ते 11.30 या वेळेत केवळ सामान्य प्रवासीच बुकिंग करू शकतील. या सर्व बदलांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये चिंता आहे. आधीच तिकीट मिळवणं कठीण, प्रवास करणं या बदलांमुळे थोडं किचकट झालं आहे. रेल्वे प्रशासनाकडून मात्र यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि तात्काळ बुकिंगमधील फसवणुकीला आळा घालण्याचा हेतू असल्याचा दावा करण्यात आला आहे. जुलैपासून प्रवास करायचा असेल तर नवे नियम समजून घ्या नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं अशा सूचना रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.