कशी झाली सुरुवात
या कंपनीची स्थापना 1979 मध्ये जयप्रकाश समूहाने केली. नोएडा मुख्यालय असलेल्या या कंपनीने हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट, सिमेंट आणि पॉवर या क्षेत्रात मोठा विस्तार केला. यमुना एक्सप्रेसवे, Jaypee Greens आणि Wish Town यांसारख्या प्रकल्पांमुळे कंपनीला देशभरात ओळख मिळाली.
सुवर्णकाळ
2007 ते 2011 हा काळ कंपनीसाठी सुवर्णकाळ होता. नोव्हेंबर 2007 मध्ये कंपनीचा शेअर 339.87च्या उच्चांकावर पोहोचला होता. त्या वेळी कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1.15 लाख कोटी होते. फॉर्म्युला-1 बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आणि यमुना एक्सप्रेसवे यांसारख्या प्रकल्पांमुळे कंपनी चर्चेत होती.
advertisement
संकटाची सुरुवात
मोठ्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जामुळे कंपनीवर आर्थिक ताण वाढू लागला. 2013 पर्यंत कंपनीचे कर्ज सुमारे 24,000 कोटींवर गेले. अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत, कॅश फ्लो कमी झाला आणि बँकांवरील दबाव वाढला.
IBC प्रक्रियेत प्रवेश
2017 मध्ये परिस्थिती इतकी गंभीर झाली की IDBI Bank ने कंपनीविरोधात इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत कारवाई सुरू केली. सुरुवातीला डिफॉल्टची रक्कम 527 कोटी होती, मात्र नंतर कर्जाचा आकडा प्रचंड वाढत गेला.
कर्जाचा डोंगर
काळाच्या ओघात कंपनीवरील एकूण कर्जाचा आकडा सुमारे 57,185 कोटींवर पोहोचला. 2023 मध्ये सरकारी मालकीच्या NARCL ने सुमारे 95% कर्ज खरेदी केले, ज्याची किंमत सुमारे 10,200 कोटी होती. यानंतर कंपनीसाठी नवीन गुंतवणूकदार शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली.
खरेदीसाठी मोठी स्पर्धा
मार्च 2025 मध्ये कंपनी खरेदीसाठी 26 कंपन्यांनी रस दाखवला. यात Adani Enterprises, Vedanta, JSW Group, Dalmia, Jindal Power आणि PNC यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. सप्टेंबर 2025 मध्ये स्पर्धा आयोगाने काही कंपन्यांना मंजुरीही दिली.
अडानी बनला टॉप बिडर
नोव्हेंबर 2025 मध्ये Adani Enterprises ने 13,500 ते 15,000 कोटींचा रेजोल्यूशन प्लॅन सादर केला. अखेरीस 14,535 कोटींच्या प्लॅनला कर्जदात्यांच्या समितीने (CoC) 89% मतांनी मंजुरी दिली. Vedanta दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
NCLT कडून मोठा निर्णय
इलाहाबाद येथील National Company Law Tribunal (NCLT) ने 17 मार्च 2026 रोजी अडानी एंटरप्राइजेसच्या रेजोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली. यामुळे कंपनीच्या इन्सॉल्व्हन्सी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली आहे. हा प्लॅन अडानी ग्रुप स्वतंत्रपणे किंवा इतर कंपन्यांसह लागू करू शकतो.
शेअर का कोसळला?
या सर्व घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. परिणामी कंपनीचा शेअर सध्या 2 च्या आसपास घसरून लोअर सर्किटमध्ये अडकलेला आहे. 339 वरून 2 पर्यंतचा हा प्रवास गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का ठरला आहे.
पुढे काय?
जर Adani Enterprises चा प्लॅन यशस्वीपणे अंमलात आला तर कंपनीच्या काही मालमत्ता पुन्हा विकसित होऊ शकतात आणि व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. मात्र ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.
