TRENDING:

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Airport Traffic Police : विमानतळ वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 175 नवीन वाहतूक पोलीस पदांना मंजुरी दिली आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास आणि सुरक्षा वाढवण्यास मदत मिळेल. ही भरती लवकरच सुरू होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यात या भागातील रस्त्यांवर प्रवाशांचा भार वाढेल आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण होईल, अशी प्रशासनाची शक्यता होती.
News18
News18
advertisement

विमानतळावर आता 'पोलीस सुरक्षा' दुप्पट, 'इतक्या' नवीन वाहतूक पोलीस पदांना मंजुरी

आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुकर प्रवास अनुभवता यावा, यासाठी राज्य शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी 175 नवीन वाहतूक पोलीस पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे.

या175 पदांमध्ये तीन पोलीस निरीक्षकांच्या पदांचा समावेश असून ते विशेषतः विमानतळ परिसरातील वाहतुकीचे नियोजन, मार्गदर्शन आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रवासात झालेल्या कोंडीमुळे निर्माण होणारी असुविधा कमी होण्यास मदत होईल तसेच वाहनचालक आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल.

advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला करण्यात आले होते. सध्या विमानतळ गाठण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्ग, अटल सेतू तसेच नेरुळ-बेलापूर-उलवे मार्गे प्रवास करता येत आहे. भविष्यात विमानतळाला जोडणारा उन्नत मार्ग देखील तयार केला जाणार आहे, ज्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा भार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

advertisement

यामुळे 6 मार्च रोजी नवी मुंबई पोलिसांनी विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी राज्य शासनाकडे पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास 29ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार 175 नवीन वाहतूक पोलीस पदांची निर्मिती केली जाणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दररोजच्या जेवणात चटकदार खायला हवंय? सोप्या पद्धतीने बनवा लिंबू क्रश लोणचे, Video
सर्व पहा

हा निर्णय प्रवाशांसाठी अत्यंत आनंददायी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरतो. भविष्यातील वाढत्या प्रवासी भाराला तोंड देण्यासाठी आणि विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय निश्चितच मोठा महत्त्वाचा ठरेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल