तिकीट दर किती?
या रेल्वेत प्रत्येक कारसोबत तीन प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा आहे. यामध्ये दोन प्रवाशांना तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यात, तर एका प्रवाशाला शयनयान डब्यात जागा मिळणार आहे. एका कारसाठी एकूण 7,875 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय तृतीय वातानुकूलितसाठी प्रति प्रवासी 935 रुपये आणि शयनयानसाठी 190 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
advertisement
Mumbai News: कबुतरांना दाणे टाकण्याआधी 10 वेळा विचार करा, भरावा लागेल मोठा दंड!
एकावेळी 40 कार नेता येणार
रेल्वे दररोज संध्याकाळी 5 वाजता कोलाडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेरणाला पोहोचेल. मात्र, रेल्वे सुटण्याच्या किमान तीन तास आधी प्रवाशांनी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक आहे. या सेवेसाठी किमान 16 कार नोंदवल्या गेल्यासच ती फेरी सुरू केली जाईल, अन्यथा ती रद्द करण्यात येणार आहे. या विशेष सेवेसाठी एकूण 20 बोगी असतील. प्रत्येक बोगीत दोन कार वाहून नेण्याची सोय असून, एकावेळी 40 कार नेण्याची क्षमता या रेल्वेगाडीत आहे.
दरम्यान, कोकणात गणपती साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी दरवर्षी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे कोकण रेल्वेची ही सुविधा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. आपल्या गाडीसह सुरक्षित, आरामदायक आणि वेळ वाचवणारा प्रवास करण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.






