TRENDING:

घाटकोपर ते विद्याविहार आता काही मिनिटांत,बहुप्रतीक्षित पुलाचे काम अंतिम टप्प्यात;पाहा कुठून-कुठे जोडणार

Last Updated:

Vidyavihar Flyover : विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात असून 2026 च्या पावसाळ्यापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे घाटकोपर, विक्रोळी आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता वेगाने पूर्ण केला जात असून 2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना या पुलाचा वापर करता येणार आहे. हा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या एन विभागाच्या हद्दीत येतो.
Ghatkopar–Vidhyavihar Bridge Work in Final Stage
Ghatkopar–Vidhyavihar Bridge Work in Final Stage
advertisement

वर्षानुवर्षे रखडलेला उड्डाणपूल अखेर मार्गी

विद्याविहार पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रेल्वेवरील उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. त्यानंतर महापालिकेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. महापालिकेनुसार या उड्डाणपुलाचं संपूर्ण काम 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

पुलाच्या पूर्वेकडील बाजूचं काम 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामध्ये जोड रस्त्यांची कामे, पुलावरचा रस्ता तयार करणे तसेच इतर गरजेची कामे समाविष्ट आहेत. मान्सून लक्षात घेता 31 मे 2026 पर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पुलाची एक बाजू येत्या महिन्यात वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.

advertisement

हा पूल कुठून-कुठे जोडला जाणार?

हा उड्डाणपूल घाटकोपर पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना थेट जोडणार आहे. रेल्वे रूळांवरून जाणाऱ्या या पुलाची एकूण लांबी सुमारे 650 मीटर असून त्यावर दोन मार्गिका असणार आहेत.

पश्चिमेकडील बाजूला आतापर्यंत सहा खांबांचे काम पूर्ण झाले असून राहिलेले चार खांब, स्पॅन आणि पोहोच रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करताना वाहतूक वळविणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे वाहतुकीवर कमी परिणाम होईल यासाठी आधी दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?
सर्व पहा

या उड्डाणपुलाची पहिली मागणी 1991 मध्ये करण्यात आली होती. तब्बल 30 वर्षांनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असून घाटकोपर, विक्रोळी आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
घाटकोपर ते विद्याविहार आता काही मिनिटांत,बहुप्रतीक्षित पुलाचे काम अंतिम टप्प्यात;पाहा कुठून-कुठे जोडणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल