TRENDING:

जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर...; दिल्लीतून केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Last Updated:

उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे, त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  बांग्लादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?  

उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बांग्लादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाग्लादेशमध्ये अराजक निर्माण झालं आहे, तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बाग्लादेशातील हिंदूंच रक्षण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होतं हे बांग्लादेशनं दाखवलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

दरम्यान मुंबईतील धारावीच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एका धारावीची वीस धारावी आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही लावू देणार नाही. धारावीच्या विकासाआड आम्ही नाही, पण धारावीकरांना धारावीतच घर मिळावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर...; दिल्लीतून केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल