नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बांग्लादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाग्लादेशमध्ये अराजक निर्माण झालं आहे, तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बाग्लादेशातील हिंदूंच रक्षण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होतं हे बांग्लादेशनं दाखवलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान मुंबईतील धारावीच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एका धारावीची वीस धारावी आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही लावू देणार नाही. धारावीच्या विकासाआड आम्ही नाही, पण धारावीकरांना धारावीतच घर मिळावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
