TRENDING:

IndiGoची कबुली धडकी भरवणारी; हजारो प्रवासी अडकले तरी म्हणाले विमान सेवा नॉर्मल...

Last Updated:

IndiGo: इंडिगोच्या ऑपरेशनल सिस्टीममध्ये झालेल्या मोठ्या बिघाडामुळे एकाच दिवशी हजारो प्रवासी देशभरातील विमानतळांवर अडकले, तर 1000 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द होत एव्हिएशन क्षेत्रात खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी देशातील विमानतळांवर मोठ्या प्रमाणात उडालेल्या उड्डाण गोंधळाची कबुली देत म्हटले की, विमानकंपनीसाठी हा ‘ऑपरेशनल डिस्रप्शन’च्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात वाईट दिवस ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या सेवांमध्ये गंभीर अडथळे येत होते आणि 5 डिसेंबर रोजी तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. या दिवशी 1,000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, जी इंडिगोच्या एकूण दैनिक उड्डाणांच्या निम्म्याहून अधिक आहेत.

advertisement

एल्बर्स यांनी सांगितले की शनिवारीही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र रद्द होणाऱ्या उड्डाणांची संख्या 1,000 च्या खाली येईल. त्यांनी प्रवाशांना हमी दिली की इंडिगोची टीम 24 तास काम करत असून 10 ते 15 डिसेंबरदरम्यान परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईल अशी अपेक्षा आहे.

advertisement

एल्बर्स यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले की इंडिगोच्या संपूर्ण ऑपरेशनल सिस्टीमचे रीबूटिंग हे या व्यापक गोंधळाचे प्रमुख कारण होते. आधीच रद्द झालेल्या उड्डाणांसाठी प्रवासी विमानतळावर येऊ नयेत, अशी त्यांनी सूचना केली. अन्यथा गैरसोय आणखी वाढेल. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही गंभीर ऑपरेशनल व्यत्यय अनुभवत आहोत. आज 5 डिसेंबर हा सर्वाधिक प्रभावित दिवस ठरला आहे.”

advertisement

ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल एल्बर्स यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली. इंडिगोच्या वतीने मी सर्व प्रवाशांची क्षमा मागतो. विलंब आणि रद्दीकरणामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खरोखरच खेद आहे, असे त्यांनी नमूद केले. गुरुवारी जारी केलेल्या स्टाफ मेलमध्ये त्यांनी मान्य केले की विमानकंपनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या वचनांना न्याय देऊ शकली नाही. त्यांनी सांगितले की लहान तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील बदल, प्रतिकूल हवामान, विमानवाहतूक क्षेत्रातील वाढलेली गर्दी आणि नव्या FDTL नियमांचे अंमलबजावणी या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून इंडिगोच्या सेवांमध्ये ‘कॅस्केडिंग इम्पॅक्ट’ निर्माण झाला आणि गोंधळ वाढतच गेला.

advertisement

या अभूतपूर्व बिघाडामुळे देशभरातील विमानतळांवर मोठ्या रांगा लागल्या, उड्डाणे तासन्तास विलंबली आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढली. यामुळे DGCA आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोकडून तात्काळ सविस्तर अहवाल मागवला आहे.

केंद्र सरकारची चौकशीची घोषणा

वाढत्या तक्रारी आणि मोठ्या प्रमाणातील गोंधळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने इंडिगोच्या उड्डाण व्यवस्थापनातील त्रुटींवर उच्च-स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. हजारो प्रवासी देशभरातील विमानतळांवर अडकून राहिल्याने सरकारला हस्तक्षेप करावा लागला. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी इंडिगोला त्वरित सुधारात्मक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रालयाने स्पष्ट केले की DGCAचे Flight Duty Time Limitations (FDTL) आदेश तात्काळ स्थगित ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून एअर सेफ्टीशी कोणताही तडजोड करण्यात आलेली नाही, असेही सरकारने नमूद केले.

दरम्यान DGCAने इंडिगोच्या उड्डाण बिघाडाला कारणीभूत ठरलेल्या गंभीर ऑपरेशनल त्रुटींची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीमार्फत संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्याच्या संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी, सर्पिल दीर्घिकेचा असा लावला शोध, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
IndiGoची कबुली धडकी भरवणारी; हजारो प्रवासी अडकले तरी म्हणाले विमान सेवा नॉर्मल...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल