७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यात १७० हून अधिक दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयाला सर्वात जास्त नुकसान झालं. इथेच भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं.
९-१० मे रोजी भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून सरगोधा, रहीम यार खान आणि नूर खान यांसारख्या पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला. यात पाकिस्तानचे किमान ४२ सैनिक मारले गेले. भारताने ठरवलेल्या सर्व ठिकाणांवर अचूक हल्ला केला, असं सूत्रांनी सांगितलं.
advertisement
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय महिला वैमानिकांनीही सहभाग घेतला. हे ऑपरेशन पूर्णपणे थांबलेलं नाही, ते फक्त थांबवलं आहे, त्यामुळे भारत सावध आहे. पाकिस्तानला मोठा अपमान सहन करावा लागला आहे, त्यामुळे ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, असं सूत्रांनी सांगितलं. "आम्ही त्यांच्या कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत. सैन्याला सज्ज राहण्यास सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे थांबलेलं नाही, ते फक्त थांबवलं आहे," असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं.
"लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवणं हा पाकिस्तानचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न आहे," असंही सूत्रांनी सांगितलं. २०१७ मध्ये डोकलाम संघर्षानंतर घेतलेल्या अनेक निर्णयामुळे भारताला हे यश मिळालं आहे. २२ मे रोजी बिकानेरमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरावर भाष्य केलं. "भारतीय रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल," असं त्यांनी ठामपणे सांगितलं. "पहलगाममध्ये गोळ्या चालल्या, पण १४० कोटी भारतीयांना वेदना झाल्या," असं मोदी म्हणाले.
भारताने २२ मिनिटांत नऊ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली, असं मोदींनी सांगितलं. "सिंदूर जेव्हा बारूद बनतो, तेव्हा काय होतं, हे जगाने पाहिलं," असं ते म्हणाले. "ज्यांनी आमचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही धूळ चारली. ज्यांनी भारतीय रक्त सांडलं, त्यांचा आम्ही हिशोब चुकता केला."
"आमच्या सरकारने तिन्ही सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं," असं मोदी म्हणाले. नल हवाई तळावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न फसला, तर भारताने रहीम खार हवाई तळाला लक्ष्य केलं आणि तो निकामी केला. "रहीम खार हवाई तळ आता आयसीयूमध्ये आहे. तो कधी उघडेल, हे कोणालाच माहीत नाही," असं मोदी म्हणाले. "भारतावर हल्ला केल्यास, जशास तसं उत्तर मिळेल. वेळ, पद्धत आणि तीव्रता आमचं सैन्य ठरवेल. आणि अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही," असं मोदींनी सांगितलं.