मेघालयचे डीजीपी आय नोंनगरंग यांनी सांगितले की, राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. मावलाखियातच्या एका टुरिस्ट गाईडने आधीच दावा केला होता की २३ मे रोजी बेपत्ता होण्यापूर्वी या जोडप्यासोबत तीन अज्ञात पुरुषही होते. गाईडच्या जबाबानंतर या प्रकरणाने नवं वळण घेतलं. गाईडने दिलेल्या टीपमुळे पोलिसांना सगळी लिंक लागली.
advertisement
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही या प्रकरणाबद्दल ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे की इंदूरच्या राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या आरोपीला पकडण्याची मोहीम अजूनही सुरू आहे.
एक चूक आणि सोनमचं बिंग फुटलं
राजा आणि सोनम लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर 23 मे रोजी दोघं बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला, तर त्याच्या पत्नीचा शोध सुरू होता. मावलाखियात येथील टुरिस्ट गाईट अल्बर्ट पीडी यांनी सांगितले की, 23 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी या जोडप्याला तीन इतर पुरुष पर्यटकांसह नोंगरियात ते मावलाखियात येथे 3000 हून अधिक पायऱ्या चढताना पाहिले होते.
त्यांनी आदल्या दिवशी नोंगरियात येथे नेण्यासाठी त्यांना गाईडची मदत करण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी दुसरा गाईड निवडला. ते चार पुरुष पुढे चालत होते, तर महिला मागे होती. ते चार पुरुष हिंदीत बोलत होते, परंतु ते काय म्हणत आहेत ते मला समजले नाही, कारण मला फक्त खासी आणि इंग्रजी येत आहे, असंही त्या गाईडने सांगितलं. गाईडसमोर घडलेला हा प्रकार सोनमला महागात पडला. येथूनच खरी लिंक मिळाली आणि सोनमभोवती अटकेचा फास आवळला गेला.