TRENDING:

असा धडा शिकवला की येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील, पाकच्या 11 एअरबेसची राख; इंडियन आर्मीने शेअर केला नवा Video

Last Updated:

Operation Sindoor New Video: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' चालवले आणि पाकिस्तानला असा धडा शिकवला की त्यांच्या पिढ्या तो विसरणार नाहीत. सैन्याने आता या ऑपरेशनचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात दहशतवाद्यांचे तळ कसे उद्ध्वस्त केले गेले हे स्पष्टपणे दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित आणखी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जवान दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. इंडियन आर्मीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, "प्लानिंग केली, ट्रेनिंग केली आणि ॲक्शन घेतला. न्याय झाला." सैन्याने स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानसाठी तो धडा होता, जो त्यांनी दशकांपासून शिकला नाही.
News18
News18
advertisement

सैन्याने आपल्या व्हिडिओमध्ये ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी आणि कारवाईची तीव्रता स्पष्ट केली आहे. सैन्याने म्हटले आहे, याची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून झाली. मनात राग नव्हता, फक्त एकच गोष्ट होती - यावेळी असा धडा शिकवायचा की त्याच्या पिढ्या लक्षात ठेवतील. ही बदला घेण्याची भावना नव्हती, हा न्याय होता. 9 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता ज्या ज्या शत्रूच्या पोस्टने सीजफायरचे उल्लंघन केले. त्या सर्व पोस्ट भारतीय सैन्याने मातीमोल केल्या. ऑपरेशन सिंदूर केवळ एक कारवाई नव्हती, तर पाकिस्तानसाठी तो धडा होता, जो त्यांनी अनेक दशकांपासून शिकला नाही.

advertisement

7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 6-7 मे च्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर'ला प्रत्युत्तर दिले. या ऑपरेशन अंतर्गत, पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी ठिकाण्यांना लक्ष्य केले गेले आणि ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारताच्या शहरांवर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले.

advertisement

पाकिस्तानकडून युद्धविराम (सीजफायर) ची विनंती आल्यानंतर 10 मे च्या सायंकाळी दोन्ही देशांमध्ये सीजफायरचा करार झाला. तथापि तोपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे 11 हवाई तळ (एअरबेस) पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याने उचललेल्या या कठोर पावलांमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही याची चर्चा सुरू आहे. सैन्याने जारी केलेल्या या व्हिडिओमुळे कारवाईची तीव्रता आणि परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
असा धडा शिकवला की येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील, पाकच्या 11 एअरबेसची राख; इंडियन आर्मीने शेअर केला नवा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल