पावसाची दमदार हजेरी आणि धरणांची सद्यस्थिती
जिल्ह्यात 15 मे पासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता, ज्यामुळे काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, आता धरणांत मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
प्रमुख धरणांमधील सद्यस्थिती (पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि टक्केवारी)
- कोयना धरण : 87.020 टीएमसी (82.68% भरले). धरणात 5,261क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- धोम धरण: 12.450 टीएमसी (92.22% भरले). धरणात 1,188 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- धोम बलकवडी धरण: 3.650 टीएमसी (89.46% भरले). धरणात 502 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- कण्हेर धरण: 9.370 टीएमसी (92.77% भरले). धरणात 1,099 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- उरमोडी धरण: 9.260 टीएमसी (92.97% भरले). या धरणात 1,075 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
- तारळी धरण: 5.080 टीएमसी (86.84% भरले). धरणात 1,162 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी आणि नागेवाडी धरणात 100 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर, मोरणा (69.77%), उत्तरमांड (69.19%), महू (80.55%), हातेघर (47.60%) आणि वांग-मराठवाडी (73.68%) या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाला आहे. या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा वर्षभर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा : कोल्हापूरची चिंता मिटली! 17 धरणे तुडुंब भरली; उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटली; पण धाकधूक कायम!
हे ही वाचा : Pune Weather: विजा कडाडणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज