TRENDING:

ठीक 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार ग्रहण! सूर्यग्रहण संपताच करा 'हे' काम, वाचा महत्वाचे नियम

Last Updated:
आज मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपले आहे. जरी हे ग्रहण भारतातून दिसले नसले, तरी ज्योतिषशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने ग्रहण काळानंतर काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
advertisement
1/7
ठीक 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार ग्रहण! सूर्यग्रहण संपताच करा 'हे' काम
आज मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपले आहे. जरी हे ग्रहण भारतातून दिसले नसले, तरी ज्योतिषशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने ग्रहण काळानंतर काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
advertisement
2/7
ग्रहणामुळे वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता दूर करण्यासाठी शास्त्रात काही विशेष नियम सांगितले आहेत. सूर्यग्रहण संपल्यानंतर घराची शुद्धी आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 6 गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
स्नान आणि शुद्धीकरण: ग्रहण संपल्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे 'स्नान' करणे. ग्रहणादरम्यान आपल्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण होण्यासाठी कडक किंवा कोमट पाण्याने स्नान करावे. स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल टाकल्यास अधिक उत्तम.
advertisement
4/7
घर आणि देवघराची स्वच्छता: केवळ स्वतःचे स्नान पुरेसे नाही, तर संपूर्ण घराचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. घरामध्ये गंगाजल शिंपडावे. देवघरातील मूर्तींना स्नान घालून त्यांचे कपडे बदलावेत आणि तुळशीच्या पानांनी देवघराची शुद्धी करावी.
advertisement
5/7
ताजे अन्न ग्रहण करा: शास्त्रानुसार, ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न अशुद्ध मानले जाते. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर ते अन्न न खाता, ताजे अन्न शिजवून घ्यावे. पिण्याच्या पाण्यात आधीच तुळशीची पाने टाकली असल्यास ते पाणी वापरता येते, अन्यथा नवीन पाणी भरून घ्यावे.
advertisement
6/7
दानधर्माचे महत्त्व: ग्रहणानंतर दिलेले दान अनेक पटीने फळ देते असे मानले जाते. आज सूर्यग्रहण असल्याने गहू, गूळ, तांब्याचे भांडे किंवा लाल रंगाचे कापड गरिबांना दान करणे अत्यंत शुभ ठरेल. यामुळे कुंडलीतील सूर्याचे दोष दूर होण्यास मदत होते.
advertisement
7/7
डोळ्यांची आणि आरोग्याची काळजी: जर तुम्ही ग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला असेल आणि आता तुम्हाला डोळ्यांत जळजळ किंवा धूसर दिसत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. ग्रहणानंतर हलका आहार घ्यावा, कारण या काळात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ठीक 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार ग्रहण! सूर्यग्रहण संपताच करा 'हे' काम, वाचा महत्वाचे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल