TRENDING:

Maharashtra HSC 12th Result 2025 : यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, परीक्षेत मुलीच कशा काय अव्वल येतात?

Last Updated:
Maharashtra HSC 12th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर,  विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.
advertisement
1/5
यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, परीक्षेत मुलीच कशा काय अव्वल येतात?
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Hsc Result) लागला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. कोणत्याही शैक्षणिक परीक्षांमध्ये मुलीच अव्वल का येतात? याबाबत ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने अभ्यास केला होता. .
advertisement
2/5
सर्वेक्षणानुसार मुलींमध्ये वाचनाची आवड जास्त असते. अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणून मुलींपेक्षा मुलांना कमी ज्ञान असते. निम्म्यापेक्षा कमी मुली दिवसभरातून किमान अर्धा तास वाचन करतात. एक तृतीयांशपेक्षा कमी मुलं इतका वेळ वाचन करतात.
advertisement
3/5
कॅनडातील न्यू ब्रन्सविक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार मुलींची लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता चांगली असते. पण मुलं अधिक लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, म्हणून ते परीक्षेत कमी पडतात.
advertisement
4/5
संशोधनानुसार मुलं मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ऑनलाईन गेम खेळतात. इंटरनेटचा वापर जास्त करतात. त्यांना कुटुंबाकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. मुली कुटुंबासह अधिक वेळ घालवतात. त्यामुळे कुटुंबाकडून चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं.
advertisement
5/5
हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. मुलं आणि मुली असा भेदभाव करण्याचा न्यूज18मराठीचा हेतू बिलकुल नाही. योग्य आणि पात्रतेनुसार अभ्यास केला तर कुणीही कुठेही कमी पडत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Maharashtra HSC 12th Result 2025 : यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, परीक्षेत मुलीच कशा काय अव्वल येतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल