भारतातील रहस्यमयी मंदिर, जिथे घडतात अविश्वसनीय घटना
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी आहेत. त्या ठिकाणी अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. अशाच काही रहस्यमयी मंदिरांविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी आहेत. त्या ठिकाणी अनेक अविश्वसणीय गोष्टी घडतात. अशाच काही रहस्यमयी मंदिरांविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/6
मां कामाख्या देवी मंदिर - आसाममधील राजधानी गुवाहाटीजवळ हे चमत्कारिक मंदिर आहे. आई भगवतीच्या 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने माता सतीचे शरीर कापले तेव्हा त्यांच्या शरीराचा एक भाग कामाख्यात पडला. माता सतीचे अवयव ज्या ठिकाणी पडले होते त्या जागेला शक्तीपीठ म्हणतात. येथे कोणतीही मूर्ती नाही, फक्त सती मातेच्या अंगाची पूजा केली जाते. इथे नेहमी दगडातून पाणी बाहेर पडतं. महिन्यातून एकदा या दगडातून रक्ताची धारा वाहत असल्याचे सांगितले जाते. हे का आणि कसे घडते? याविषयी शास्त्रज्ञही सत्य शोधू शकलेले नाहीत.
advertisement
3/6
कोडुंगल्लूर भगवती मंदिर - केरळमधील कोडुंगल्लूर भगवती मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचाही शक्तिशाली शक्तीपीठांमध्ये समावेश होतो. कोडुंगल्लूर भगवती मंदिराचे रहस्य असे आहे की येथे होणारी पूजा किंवा विधी केवळ देवीच्या सूचनेनुसार केले जातात.
advertisement
4/6
तिरुपती बालाजी मंदिर - हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर आहे आणि भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तिरुपती बालाजीचे खरे नाव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहे. श्रद्धेनुसार भाविक येथे येतात आणि तिरुपती मंदिरात केस दान करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे एका वर्षात सुमारे 75 टन केस उगवले जातात. हे केस विकून तिरुपती मंदिराला 6.5 दशलक्ष रुपयांहून अधिक कमाई होते.
advertisement
5/6
ब्रम्हा मंदिर - ब्रह्मा मंदिर पुष्कर, राजस्थान येथे स्थित आहे, जे अत्यंत रहस्यमय आहे. 14 व्या शतकात बांधलेले ब्रह्मा मंदिर दोन हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. हे मंदिर आदि शंकराचार्य आणि ऋषी विश्वामित्र यांनी बांधले होते.
advertisement
6/6
करणी माता मंदिर - राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथे करणी माता मंदिर आहे. करणी माता हे उंदरांच्या मातेचे मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.धार्मिक मान्यतेनुसार ज्यांना पांढरा उंदीर दिसतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे उंदीर कोणाचेही नुकसान करत नाहीत.