प्रवासाचे गणितच बदलले!
सध्या बोरिवली ते चर्चगेट हा लोकलचा प्रवास साधारण ५० ते ६० मिनिटे घेतो. मात्र, प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार होणार आहे. म्हणजे उपनगरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्याआधीच तुम्ही दुसऱ्या शहरात पोहोचलेले असाल.
advertisement
महत्त्वाचे बदल -
मुंबई-पुणे प्रवास: आताचा ४ तास (रस्ते/रेल्वे) → बुलेट ट्रेनने ४८ मिनिटे.
पुणे-हैदराबाद प्रवास: आताचा ८ ते १० तास → बुलेट ट्रेनने १ तास ५५ मिनिटे.
वेग: ताशी ३०० ते ३२० किलोमीटर प्रति तास.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी आणि 'वंदे भारत' सारख्या गाड्यांमधील वेटिंग लिस्ट या त्रासातून प्रवाशांची कायमची सुटका होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, या हायस्पीड कॉरिडॉरमुळे केवळ वेळ वाचणार नाही, तर आयटी, शिक्षण, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही तीन महत्त्वाची आर्थिक केंद्रे एकमेकांशी जोडली गेल्याने गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
