TRENDING:

Pune News : लॉकडाऊनचा 'तो' निर्णय पुणे-मुंबईकरांसाठी ठरला डोकेदुखी; प्रवासाचा मनस्ताप संपता संपेना

Last Updated:

Pune Mumbai Train : पुणे-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दी, वेळेचा ताण आणि कनेक्टिव्हिटीचा अभाव यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बंद झालेल्या लोकल गाड्या तातडीने सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आणि मुंबईत राहणारे लोक दररोज या दोन शहरात प्रवास करत असतात. मात्र दिवसेंदिवस हा दररोजचा रेल्वेचा प्रवास अधिकच खडतर होत चालला आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस अशा गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज वेळेच्या ताणात, गर्दीत आणि असुविधांमध्ये प्रवास करावा लागतो. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे, मुलांच्या शाळेसाठी वेळेत येणे किंवा इतर वैयक्तिक कामांमध्ये वेळेवर पोहचणे या सगळ्या गोष्टींवर प्रवाशांचा ताण वाढतो.
News18
News18
advertisement

सर्वात मोठी समस्या म्हणजे कनेक्टिव्हिटीचा अभाव. पुणे-मुंबई दरम्यान लोकल आणि स्पेशल ट्रेनांच्या वेळा प्रवाशांच्या सोयीच्या नसल्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. अनेकजणांना वेळेवर पोहचण्यासाठी विविध गाड्यांमध्ये बदल करावे लागतात, ज्यामुळे प्रवास अधिक थकवणारा होतो. याच कारणाने प्रवाशांचे मानसिक तणावही दिवसेंदिवस वाढत आहे.

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने या समस्येबाबत अनेकवेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी प्रवाशांच्या समस्या स्पष्ट केल्या आणि त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने अद्याप या तक्रारींना गंभीरपणे घेतलेले नाही ज्यामुळे प्रवाशांची नाराजी वाढत आहे.

advertisement

डेक्कन क्वीनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की कोविडपूर्वी रेल्वे सेवा अधिक चांगली होती आणि वेळापत्रक प्रवाशांच्या गरजेनुसार अधिक सुलभ होते. कोविडनंतर अनेक गाड्या तसेच पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत. दररोजच्या प्रवासात गर्दी, उशीर आणि असुविधा सहन करणे प्रवाशांसाठी त्रासदायक झाले आहे.

advertisement

प्रवाशांची मागणी आहे की बंद झालेल्या गाड्या आणि लोकल सेवा तातडीने पुन्हा सुरु कराव्यात. तसेच वेळापत्रक प्रवाशांच्या दैनंदिन गरजांनुसार बदलणे गरजेचे आहे. फक्त गाड्या सुरु करणे पुरेसे नाही. प्रवाशांची सुविधा, वेळापत्रक, आणि कनेक्टिव्हिटी सुधारावी लागेल. यातून प्रवाशांचा प्रवास सोपा, जलद आणि कमी तणावपूर्ण होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

या सर्व कारणांमुळे पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या आणि बंद सेवा पुन्हा सुरु केल्या तर हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल आणि त्यांचा मानसिक तणावही कमी होईल.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : लॉकडाऊनचा 'तो' निर्णय पुणे-मुंबईकरांसाठी ठरला डोकेदुखी; प्रवासाचा मनस्ताप संपता संपेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल