TRENDING:

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी 'प्लॅन'; पण बांधकाम विभागाच्या विलंबामुळे महिनाभरापासून ब्रेक

Last Updated:

नवले पुलावर सातत्याने होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी स्थानिक वाहनांची वर्दळ मुख्य महामार्गावरून कमी करणे आवश्यक आहे. यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना १२ मीटर रुंदीचे सेवा रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पूल परिसरातील सेवा रस्त्याचे काम प्रशासकीय उदासीनतेमुळे रखडले असल्याचे चित्र दिसत आहे. नऱ्हे येथील पुलाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ते तयार करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी ती संथ गतीने पुढे सरकत आहे. गेल्या १७ नोव्हेंबर रोजी जमिनीची दरनिश्चिती करण्यात आली होती. त्यानंतर तांत्रिक मूल्यांकनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप मूल्यांकन पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब होत आहे.
नवले ब्रिज 
नवले ब्रिज 
advertisement

नवले पुलावर सातत्याने होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी स्थानिक वाहनांची वर्दळ मुख्य महामार्गावरून कमी करणे आवश्यक आहे. यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना १२ मीटर रुंदीचे सेवा रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची महत्त्वाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोपवण्यात आली आहे. या ६१५ मीटर लांबीच्या रस्त्यासाठी महामार्ग क्रमांक ४८ च्या दोन्ही बाजूंना मिळून सुमारे ७३८४ चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. ही जागा वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. परंतु जर जमीन मालकांकडून विरोध झाला तर सक्तीने भूसंपादन करण्याचा पर्यायही प्रशासनाने खुला ठेवला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

या कामात केवळ प्रशासकीय विलंबच नाही, तर आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेचा अडथळाही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असून, लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन निविदा काढताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. उपजिल्हाधिकारी यशवंत माने यांनी स्पष्ट केले आहे की, पीएमआरडीएकडून भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या रस्त्याची प्रत्यक्ष उभारणी करेल. मात्र, सध्या पीडब्ल्यूडी कडे प्रलंबित असलेल्या मूल्यांकनामुळे या संपूर्ण प्रक्रियेला 'ब्रेक' लागला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी 'प्लॅन'; पण बांधकाम विभागाच्या विलंबामुळे महिनाभरापासून ब्रेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल