तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहित महिलांनी उपवास आणि पूजा करावी. तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि नात्यात निर्माण झालेली दरीही दूर होते, असे मानले जाते. ज्योतिष तज्ज्ञांकडून तुळशी विवाहाच्या दिवशी करावयाचे उपाय जाणून घेऊया.
तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय करा -
तुळशीला मध अर्पण करा - पती-पत्नीमध्ये सुरू असलेले वैमनस्य दूर करण्यासाठी तुळशीविवाहाच्या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचे लग्न लावा. पूजेमध्ये तुळशीला लाल चुनरी आणि मधाच्या वस्तू तसेच सिंदूर, बिंदी, बांगडी, लाल वस्त्र इत्यादी अर्पण करा. पूजेनंतर या मधाच्या वस्तू विवाहित महिलेला दान करा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.
advertisement
जुळतील नातेसंबंध - छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमधील वाद इतके वाढतात की, नात्यात त्रास निर्माण होतो. यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची काही पाने पाण्यात मिसळा. त्यानंतर तुळस मिसळलेले हे पाणी घरभर शिंपडा. या उपायाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते आणि पती-पत्नीच्या नात्यातील समस्या दूर होतात.
बिकट काळ खूप सोसला! आता चमकणार या 5 राशींचे भाग्य; शनी-राहुची कृपादृष्टी
एकत्र पूजा करावी- तुळशीविवाहाच्या दिवशी पती-पत्नीने एकत्र पूजा केल्यास त्याचाही फायदा होतो. यामुळे परस्पर प्रेम वाढते आणि वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. पूजेमध्ये तुळशीच्या मंगलाष्टकांचे पठण करणेही लाभदायक असते.
अबुजा मुहूर्त - अबुजा मुहूर्त तुळसी विवाहाच्या दिवशी होतो. हा दिवस विवाहासाठी शुभ आहे. तुळशीविवाहानंतर चार महिन्यांपासून थांबलेले विवाह, मंगलकार्यांचे शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत.
खूप काळाचा संघर्ष नोव्हेंबरमध्ये फळास! 4 ग्रहांचे राशीपरिवर्तन देणार चौफेर फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)