पितृदोष निवारणासाठी 'हे' 2 प्रभावी उपाय
अमावस्येच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. पहिला उपाय म्हणजे 'तर्पण आणि पिंडदान'. या दिवशी सकाळी लवकर स्नान उरकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे. यामुळे पितर तृप्त होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. दुसरा उपाय म्हणजे 'पिंपळाच्या झाडाची पूजा'. पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो असे मानले जाते. अमावस्येला पिंपळाच्या मुळाशी दूध मिश्रित जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होते.
advertisement
दानाचे महत्त्व: 'या' वस्तूंचे करा दान
अमावस्येच्या दिवशी दान केल्याने दानाचे फळ अनेक पटीने वाढते. पितृदोषाच्या निवारणासाठी या दिवशी काळे तीळ, सात धान्ये, पांढरे वस्त्र आणि जोडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नाचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. शक्य असल्यास गरिबांना गुळ आणि हरभरा डाळ दान करा. असे मानले जाते की, या वस्तूंच्या दानामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.
अमावस्येला चुकूनही करू नका 'या' गोष्टी
चैत्र अमावस्या ही आध्यात्मिक साधनेची तिथी असल्याने या दिवशी काही गोष्टी टाळणे अनिवार्य आहे. या दिवशी विसरूनही तामसिक भोजन आणि मद्यपान करू नका, अन्यथा घराची प्रगती थांबते. तसेच, या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा कुणाचा अपमान करू नका. अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा स्मशानाजवळ जाणे टाळावे, कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा शुभ कार्याची सुरुवात करणे टाळले जाते, कारण ही तिथी केवळ पितर आणि आध्यात्मिक कार्यासाठी राखीव असते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
