TRENDING:

Kartiki Ekadashi 2025: गजेंद्रमोक्ष, विष्णुसहस्त्रनाम, पुरुषसूक्त...! कार्तिकीला या मंत्रांचा जप, पुण्यकर्मात भर

Last Updated:

Kartiki Ekadashi 2025: स्कंदपुराणात वर्णन केल्यानुसार, कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या वैदिक मंत्रांचा जप केल्याने इच्छित फळ मिळते. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर मंत्रांचा जप करणे विशेष फलदायी असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी किंवा देवोत्थान म्हणजेच कार्तिकी एकादशी या नावानंही ओळखलं जातं. या दिवशी जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. या शुभप्रसंगी भगवान विष्णूची विशेष पूजा-अर्चा केली जाते. कार्तिकीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
News18
News18
advertisement

कार्तिकी एकादशी तिथीपासून शुभ कार्यांचा शुभारंभ होतो. या दिवशी प्रथम भगवान विष्णूच्या शालीग्राम स्वरूपाचा देवी तुळशीसोबत विवाह होतो आणि त्यानंतरच लग्न-विवाहाचे मुहूर्त मिळतात. या एकादशीला भगवान शालीग्राम (अनेक ठिकाणी कृष्णाचीच मूर्ती तुळशीत ठेवली जाते) आणि माता तुळशीच्या विवाहाचीही परंपरा आहे.

स्कंदपुराणात आहे एकादशीचे वर्णन - स्कंदपुराणात वर्णन केलं आहे की, कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या वैदिक मंत्रांचा जप केल्याने इच्छित फळ मिळते. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर मंत्रांचा जप करणे विशेष फलदायी असते.

advertisement

शास्त्रामध्ये वर्णन केले आहे की, कार्तिकी एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून भगवान विष्णूच्या वैदिक मंत्राचा जप करावा. ब्रह्म मुहूर्तावर ॐ विष्णवे नमः, ॐ अं वासुदेवाय नमः, ॐ नारायणाय नमः, ॐ नमो भगवते वासुदेवाय इत्यादी मंत्रांचा जप केला पाहिजे.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची होते पूजा - कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. विविध प्रकारची फळे यांनी पूजा केली जाते आणि ऊसाचे पहिल्यांदाच विधी-विधानाने सेवन करणे सुरू केले जाते.

advertisement

कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळस, तीळ, केळी, पिवळी वस्त्रे इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात. देवाला जनेऊ (यज्ञोपवीत) आणि नवीन वस्त्र अर्पण केले जातात.

आणखी काय हवं? वर्ष 2026 मध्ये शनि-गुरू या 5 राशींवर मेहरबान; तुफान कमाईचे योग

advertisement

पुरुषसूक्त मंत्रांचे पठण करा - स्कंदपुराणात कार्तिक महिन्याचे महत्त्व आणि एकादशी तिथीचे खास महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने वर्णन केले आहे. स्कंदपुराणाच्या कार्तिक महात्म्य खंडात ब्रह्मदेव सांगतात की, जो पुरुष कार्तिक महिन्यात दररोज पुरुषसूक्त मंत्रांनी किंवा पाच रात्रींपर्यंत विधीनुसार भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याला मोक्ष मिळतो. जो कार्तिकी एकादशीला ॐ नमो नारायणाय या मंत्राने श्रीहरीची आराधना करतो, तो नरकाच्या दुःखातून मुक्त होऊन, रोग आणि शोकातून सुटून वैकुंठ धाम प्राप्त करतो.

advertisement

गजेंद्रमोक्षाचे पठण- कार्तिक महिन्यात जो मनुष्य विष्णुसहस्रनाम आणि गजेंद्रमोक्षाचे पठण करतो, त्याचा या संसारात पुन्हा जन्म होत नाही. जो कार्तिक महिन्यात रात्रीच्या वेळी भगवानांच्या स्तुतीचे गान करतो, तो पितरांसह श्वेतद्वीपात निवास करतो.

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला शंखासुर दैत्य मारला गेला होता. याच दिवसापासून सुरू होऊन भगवान चार महिने क्षीरसागरात शयन करतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. या कारणामुळे वैष्णवांनी एकादशीला या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवानांना जागे केले पाहिजे.

Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Kartiki Ekadashi 2025: गजेंद्रमोक्ष, विष्णुसहस्त्रनाम, पुरुषसूक्त...! कार्तिकीला या मंत्रांचा जप, पुण्यकर्मात भर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल