गणपती बाप्पासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले फळ म्हणजे केळी. केळी हे स्थिरतेचे प्रतीक आहे. गणपती पूजेत केळीचे झाड किंवा पान देखील वापरली जातात. केळी हे स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे बाप्पाला केळी अर्पण करणे म्हणजे घरात स्थैर्य आणि सुख-समृद्धी येवो, ही भावना असते.
Ganesh Chaturthi 2025: डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीत फरक काय? घरात कोणती मूर्ती पुजावी?
advertisement
दुसरे फळ आहे नारळ. नारळ हे पवित्रतेचे प्रतीक आहे. नारळ हे कोणत्याही पूजेतील आवश्यक घटक आहे. गणपती पूजेत नारळाचा वापर पवित्रता आणि एकाग्रतेचे प्रतीक म्हणून होतो. नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करून आत्मशुद्धी साधणे असे मानले जाते.
तिसरे फळ आहे सीताफळ. सीताफळ हे शुद्ध आणि सात्विक फळ आहे. सीताफळ हे गणपतीला अत्यंत प्रिय फळ मानले जाते. सीताफळ गोडसर, पचण्यास हलके आणि सात्विक असल्याने ते पूजेसाठी योग्य मानले जाते. काही ठिकाणी गणेशोत्सवात सीताफळाचा नैवेद्य खास दिला जातो.
चौथे फळ आहे सफरचंद आणि द्राक्षे हे दोन्ही आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गणपतीला सफरचंद अर्पण करणे म्हणजे भक्तांच्या जीवनात आरोग्य नांदो, ही भावना त्यातून निष्पन्न होते. त्याचबरोबर द्राक्षे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणूनही ते पूजेत दिले जाते.
पाचवे फळ आहे पेरू. पेरूमध्ये सत्त्वगुणाची वृद्धी असते. पेरू हे फळही गणपतीला अर्पण केले जाते. पेरूमध्ये असलेले पोषक घटक आणि त्याचा सहज पचणारा गुणधर्म यामुळे ते सात्विक अन्न मानले जाते. गणपतीला नैवैद्य म्हणून सर्वच फळ दिली जातात. काही ठिकाणी आंबा सुद्धा गणपतीला नैवैद्य म्हणून दिला जातो. पण, सहसा गणेशोत्सवाच्या वेळी आंब्याचे सिजन राहत नाही. त्यामुळे गणपतीच्या नैवद्यमध्ये आंबा हे फळ आढळून येत नाही.
गणेश पूजेत वापरली जाणारी फळे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, त्यामध्ये आरोग्यदायी घटकही मोठ्या प्रमाणात असतात. नैवेद्याचे सेवन केल्यानंतर भक्तांना ऊर्जा, पचनास मदत, आणि संतुलित आहार मिळतो, हेही या परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे, अशी माहिती पुजारी येलकर महाराज यांनी दिली.