शरद उपाध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार, आजच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. आज विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत, कारण तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच, एकादशीच्या दिवशी घरात तांदूळ शिजवू नयेत आणि भात खाणे पूर्णपणे वर्ज्य करावे, असा शास्त्राचा संकेत त्यांनी दिला आहे. जे भाविक शारीरिक कारणांमुळे पूर्ण उपवास करू शकत नाहीत, त्यांनी अल्प उपाहार करावा, मात्र अन्नाबाबत संयम पाळावा.
advertisement
फुल्ल तयारीत राहा! 15 मार्चपासून या 3 राशींचे नशीब पालटणार; सूर्यासह तीन ग्रहांचा वरदहस्त
केवळ आहारावरच नव्हे, तर आपल्या वाणीवर आणि वर्तनावरही आज ताबा असणे आवश्यक आहे. शरद उपाध्ये सांगतात की, आज प्रत्येकाने मितभाषी असावे. मनावर संयम ठेवून कोणाबद्दलही अपशब्द वापरणे, मनात द्वेष किंवा मत्सर ठेवणे टाळावे. हा दिवस आध्यात्मिक चिंतनाचा असल्याने दुपारी झोपणे टाळून आपले मन ईश्वरी नामस्मरणात गुंतवावे.
द्विपुष्कर योगात आज पापमोचनी एकादशीचं व्रत; पूजा विधी-मुहूर्त, कथा पाहा
आजच्या दिवशी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा सतत जप करणे अत्यंत फलदायी ठरेल. यासोबतच सूर्यस्तुती, महालक्ष्मी अष्टक आणि दुर्गास्तोत्र पठण केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पापमोचनी एकादशीचा हा दुर्मिळ योग साधून भक्ती आणि संयमाचा मार्ग स्वीकारल्यास मनाला शांती लाभते आणि जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते, असे राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी नमूद केले आहे.
बहुप्रतिक्षित गुडन्यूज येणार! 16 मार्चला महालक्ष्मी राजयोग जुळला; 3 राशींचे दिवस पालटणार
पापमोचनी एकादशी शुभ योग - आज एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग आणि शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच मीन राशीत शुक्र, शनी आणि सूर्य एकत्र असल्याने शुक्रादित्य योग आणि त्रिग्रही योग तयार होत आहेत. या शुभ लोकांमुळे आजच्या तिथीचे महत्त्व खूप वाढले आहे.
