पौराणिक आणि सनातनशी संबंधित विषयांवर लेखक अक्षत गुप्ता सांगतात की, भगवान रामाच्या जन्मानंतर देवतांना समजलं की त्यांनी अशा एका चांगल्या माणसाला पृथ्वीवर पाठवलं आहे, जो आपल्या वडिलांचं एक वचन पूर्ण करण्यासाठी सिंहासन सोडत होता. तो माणूस समुद्राच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या राज्यावर कसा हल्ला करेल? मग कदाचित देवी लक्ष्मी सर्व देवतांच्या मदतीसाठी आल्या असतील. लक्ष्मीजी म्हणाल्या असतील की काही फरक पडत नाही, मारणारा एक सामान्य माणूस असावा, पण त्याच्या आजूबाजूला मदत असू शकते म्हणून मी जाईन.
advertisement
सीता प्रभू श्रीरामांंना काय म्हणायच्या, कोणत्या नावाने हाक मारायच्या?
यावर देवांनी त्यांना सांगितलं असेल की नाही, नाही. जर तुम्ही मानवापासून म्हणजेच योनीतून जन्माला आलात, तर मेघनादचं जीवन सुरक्षित आणि चांगलं करण्यासाठी रावणाने सर्व ग्रहांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवलं आहे. म्हणून जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो ग्रहांची स्थिती बदलून तुमची बुद्धी भ्रष्ट करेल. त्याच्या आज्ञेनुसार ग्रह फिरतात. यामुळे अराजकता निर्माण होईल आणि तो तुमचा ताबा घेईल.
यावर लक्ष्मीजी म्हणाल्या की जर मी योनीतून जन्माला आले तर तो मला नियंत्रित करेल, म्हणून जेव्हा मी पृथ्वी सोडेन तेव्हा माझ्याकडे जन्मतारीख आणि वेळ नसेल, मग माझी कुंडली कशी बनवली जाईल. जर कुंडली नसेल तर ग्रहांबद्दल काय म्हणता येईल. म्हणूनच सीताजी पृथ्वीवरून प्रकट झाल्या.
Ramayana : रावणाच्या लंकेत सीतेचं रक्षण करणाऱ्या त्रिजटा राक्षसीणीचं नंतर काय झालं?
हिंदू कॅलेंडरनुसार, सीताजींचा जन्म वैशाख शुक्ल नवमी तिथीला झाला होता, म्हणून त्या दिवशी जानकी जयंती किंवा सीता नवमी साजरी केली जाते. तारीख नमूद असली तरी जन्मवेळ दिलेली नाही.
सीता मातेच्या जन्माशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्यामध्ये वाल्मिकी रामायणाची कथा अधिक प्रामाणिक मानली जाते. वाल्मिकी रामायणात, सीता माता पृथ्वीवर प्रकट झाल्याची कथा आहे, ज्यामध्ये जनक शेत नांगरताना सीता बाळाच्या रूपात सापडते. तिच्या जन्माच्या वेळी पाऊस पडतो आणि मिथिलातील दुष्काळ संपतो.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, विष्णूची भक्त वेदवती नावाच्या एका महिलेने रावणाला शाप दिला की ती त्याची मुलगी म्हणून जन्म घेईल आणि त्याच्या विनाशाचं कारण होईल. असं म्हटलं जातं की रावण आणि मंदोदरीच्या पोटी तीच सीता बाळ म्हणून जन्माला येते आणि रावण तिला समुद्रात फेकून देतो. देवी वरुणी त्या मुलीला पृथ्वीमातेच्या स्वाधीन करते. तिला राजा जनकाने कन्या म्हणून स्वीकारलं.
अद्भुत रामायणानुसार, ऋषी गृत्समद देवी लक्ष्मीला आपली कन्या म्हणून प्राप्त करण्यासाठी तपस्या करत होते. मग रावण आला आणि त्याने त्या आश्रमातील ऋषींना मारलं आणि त्यांचं रक्त एका भांड्यात गोळा करून लंकेला नेले. मंदोदरी त्या घागरीचं रक्त प्यायली आणि ती गर्भवती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला आणि मिथिलाकडे गेली आणि तिला जमिनीत लपवून ठेवलं.