प्रदक्षिणेला मोठं महत्त्व
आपल्या शास्त्रामध्ये प्रदक्षिणेचं मोठं महत्त्व आहे. देवी-देवता, मंदिर, झाडं, नर्मदासारख्या नदीची प्रदक्षिणेसह नगराची देखील प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. या प्रदक्षिणेनंतर गेल्या जन्मातलं संचित पाप निघून जातं, अशी समजूत आहे. गर्भवती स्त्री ज्या पद्धतीनं सावकाश चालते त्याच पद्धतीनं आपण प्रदक्षिणा घातली पाहिजे, असं धानोरकर गुरुजी यांनी सांगितलं.
नागपुरातील ही प्रसिद्ध शिव मंदिरं माहितीयेत का? श्रावणात नक्की घ्या दर्शन
advertisement
महादेवाला अर्धी प्रदक्षिणा का?
महादेवाला अर्पण केलेलं दूध आणि पाणी वाहून जातं त्या ठिकाणी चंडीश्वर देवाची स्थापना झाली असते. या देवाला ओलांडू नये. त्याचबरोबर तिथं माता पार्वती शक्ती रुपानं विराजमान असते, त्याला ओलांडू नये, असा प्रघात आहे अशी माहिती धानोरकर यांनी दिली.
पितृदोषामुळे घरात अशा अडचणी निर्माण होतात, हे संकेत ओळखून करा उपाय
मंदिराला प्रदक्षिणा घालताना ज्या ठिकाणी जलधार आहे तिथे नमस्कार करून आलेल्या मार्गाने परत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घ्यायचं. शक्ती रूपाला कधी ओलांडायचं नाही . तिथे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आपल्यामध्ये ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी तिथे नमन करायचं. त्यानंतर परत आलेल्या मार्गान जाऊन भगवान महादेवाचे दर्शन घ्यावे आणि आराधना करावी, असा सल्ला धानोरकर गुरुजींनी दिला.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)