भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता टी-20 सीरिज होणार आहे. 5 मॅचची ही सीरिज भारतात होणार आहे. सीरिजची पहिली टी-20 मॅच 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणमला होईल, तर दुसरी मॅच 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरमला, तिसरी मॅच 28 नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये, चौथी मॅच 1 डिसेंबरला नागपूर आणि पाचवी मॅच 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये होईल. हे पाचही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.
advertisement
World Cup 2023 : फायनल दरम्यान अनुष्काच्या ड्रेसचीच चर्चा, किंमत इतकी की ऐकून कपाळाला पडतील आठ्या
बीसीसीआयने आगामी टी 20 मालिकेसाठी आता टीम इंडियाची घोषणा केली असून यात अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवली असून उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याची निवड केली आहे. यासह आयपीएलमध्ये केकेआरचा मॅच विनर रिंकू सिंहला देखील संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार