पराभवाला जबाबदार कोण? गंभीर म्हणतो...
टीम इंडियाच्या पराभवाला कुणी एक खेळाडू जबाबदार नाही. पराभवाला सर्वच खेळाडू जबाबदार आहेत. रेड बॉल क्रिकेटमध्ये खुप सुधारणा करण्याची गरज आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जास्त नाही पण रेड बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दोष सर्वांवर असतो, पण सुरुवात माझ्यापासून होते, असं म्हणत गंभीरने हात झटकण्याचा प्रयत्न केला.
advertisement
बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल - गंभीर
क्रिकेटमध्ये टीमच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे टीम इंडियाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मी तोच आहे, ज्याने इंग्लंडमध्ये रिझल्ट दाखवून दिला आहे, तेही याच संघासोबत... त्यामुळे आता बीसीसीआयला निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल. टीम इंडिया सर्वात महत्त्वाची आहे, गंभीर नाही, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. ड्रेसिंग रुमची जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारी घेण्यापेक्षा ड्रेसिंगमध्ये काळजी घेण्याची भूमिका महत्त्वाची आहे, असंही गंभीर म्हणाला आहे.
गंभीरने स्वत:ला दिलं क्रेडिट
दरम्यान, मी तोच माणूस आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला, असं म्हणत गंभीरने स्वत:ला क्रेडिट दिलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरकडून आश्विनसारखी अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. ही युवा टीम आहे, त्यामुळे अनुभवाची आणि वेळेची गरज आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
