TRENDING:

टीम इंडियातून हकालपट्टी,त्यानेच मैदानात केला राडा, संघ बाद झाला तरी एकटाच 174 वर Not Out

Last Updated:

वेस्ट इंडिज दौऱ्यात डच्चू देण्यात आला होता. पण आता याच खेळाडूने मैदान मारलं आहे.या खेळाडूने 174 धावांची नाबाद खेळी केली आहे.या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ranji trophy 2025-26
ranji trophy 2025-26
advertisement

Karun Nair Century, Ranji Trophy 2025-26 : टीम इंडियात सध्या भयंकर स्पर्धा वाढली आहे. एका मालिकेत एखादा खेळाडू फ्लॉप ठरला तर त्याला लगेचच दुसऱ्या मालिकेत बसवलं जातं. असं एका खेळाडूसोबत इंग्लंड मालिकेदरम्यान घडलं होतं.त्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात डच्चू देण्यात आला होता. पण आता याच खेळाडूने मैदान मारलं आहे.या खेळाडूने 174 धावांची नाबाद खेळी केली आहे.या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. या खेळीने त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घ्या.

advertisement

हा तोच खेळाडू आहे ज्याने क्रिकेटकडे एक संधी मागितली होती. त्यानंतर त्याला इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. पण या संधीच त्याला सोनं करता आलं नव्हतं आणि तो सपशेल अपयशी ठरला होता. हा खेळाडू अर्थात करूण नायर होता. इंग्लंड विरूद्ध मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर त्याला वेस्ट इंडिज विरूद्ध मालिकेतून बाहेर करण्यात आले होते.

advertisement

या दरम्यान संघातून बाहेर झाल्यानंतर करूण नायरने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला होता.हा त्याचा निर्णय़ आता यशस्वी ठरला आहे.कारण त्याने कर्नाटककडून खेळताना गोवा संघाविरूद्ध 174 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.या त्याच्या खेळीने त्याने पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये पार पडणाऱ्या टेस्ट मालिकेत त्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

दरम्यान रणजी ट्ऱॉफी मालिकेत कर्नाटकची सूरूवात चांगली झाली नव्हती.कर्नाटकचे 26 धावांवर 2 विकेट पडले असताना नायर मैदानात आला होता.

यावेळी त्याने पहिल्यांदा श्रेयस गोपाळ (57) सोबत 94 धावांची आणि नंतर विजयकुमार वैशाख (31) सोबत 60 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने शतक पूर्ण केले आणि त्याचे २५ वे प्रथम श्रेणी शतक नोंदवले, जे विदर्भासोबत खेळल्यानंतर कर्नाटकात परतल्यानंतरचे त्याचे पहिले शतक होते. त्याने 267 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 174 धावा केल्या. या धावांच्या बळावर कर्नाटकचा पहिला डाव 371 धावांवर ऑल आऊट झाला होता. तर गोव्याचा डावाला सुरुवात झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियातून हकालपट्टी,त्यानेच मैदानात केला राडा, संघ बाद झाला तरी एकटाच 174 वर Not Out
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल