Prithvi Shaw VIDEO : टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ वादात सापडला आहे. रणजी ट्रॉफी सराव सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्याचा मुंबईचा सरफराज खानचा भाऊ मुशीन खानसोबत वाद झाला होता. या वादातून पृथ्वी शॉ पहिल्यांदा त्याची कॉलर पकडायला धावला त्यानंतर त्याने बॅटने त्याला मारल्याची घटना घडली.या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे. पण पृथ्ली शॉ मूशीर खानवर इतका का रागावला? यामागचं खऱं कारण आता समोर आलं आहे.
advertisement
खरं तर रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई संघात सराव सामना सूरू आहे. या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने शतकीय खेळी केली होती.त्यानंतर पुढे जाऊन तो द्विशतक मारण्याच्या उंबरठ्यावर होता. याचवेळी मुशीर खानच्या बॉलवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ कॅचआऊट झाला होता. पृथ्वी शॉ ज्यावेळेस आऊट झाला तेव्हा तो 220 बॉलमध्ये 181 धावांवर खेळत होता.त्यामुळे द्विशतकापासून अवघ्या 19 धावा दूर असताना तो आऊट झाला होता. त्यामुळे पृथ्वी शॉ प्रचंड रागावला होता.
पण खरं कारण पृथ्वी शॉ आऊट झाल्यामुळे रागावला नव्हता. तर मुशीर खानने त्याला आऊट करताच त्याला थँक यू म्हटलं होतं.याचा त्याला प्रचंड राग आला आणि तो पहिल्यांदा त्याची कॉलर पकडायला धावला. त्यानंतर पृथ्वीने त्याला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान मैदानातील अंपायरने लगेच मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.पण पृथ्वी शॉ मैदान सोडेपर्यंत लालबुंद झाला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे या राड्यामुळे पृथ्वी शॉ नवीन वादात सापडला आहे.
दरम्यान यापूर्वी पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते परंतु खराब कामगिरीमुळे तो वारंवार बाद होत होता. यामुळे शॉ चांगल्या संधींच्या आशेने महाराष्ट्रात सामील झाला. आता, मुंबई सोडल्यानंतर, तो आगामी स्थानिक हंगामात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो आहे.