ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलचा सामना, सूर्या म्हणतो...
टीम इंडिया आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेली तर कोणती टीम समोर असावी असं वाटतं आणि कोणत्या स्टेडियमवर? असा सवाल रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला विचारला गेला. त्यावेळी सूर्याने रोहितच्या जखमेवरची खपली काढली. अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलचा सामना खेळायला आवडेल, असं सूर्या म्हणाला. सूर्याच्या उत्तरावर रोहित शर्माला माईक देण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने एक हात लांब ठेऊन उत्तर दिलं.
advertisement
भूतकाळात जे झालं ते झालं... - रोहित शर्मा
टीम इंडिया फायनलमध्ये जावी, असं मला देखील वाटतं. पोरं त्यासाठी मेहनत घेत आहेत. मी एका कोणत्या टीमवर बोट ठेऊ शकत नाही. ही टीम हवी की ती टीम हवी... भुतकाळात जे झालं ते झालं. सूर्या जे म्हणाला, ती मनातली खूप हार्ड गोष्ट आहे. टीम इंडिया फानयलमध्ये जावी आणि जिंकणं हे पाहणं मला आवडेल. बाकीचे काय म्हणतात, हे मला माहिती नाही पण मला विरोधी संघ कोणता आहे, याने मला फरक पडत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी
अहमदाबादमधील त्या फायनल सामन्यानंतर देव दयाळू आहे, असं मला वाटतं. आम्ही फायनलमध्ये गेलो आणि फायनल खेळलो, हा एक चमत्कार होता आणि त्यानंतर आम्ही 8 महिन्यानंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे मी खूप आनंदी होतो, असं रोहित शर्मा म्हणाला. मात्र, रोहितच्या चेहऱ्यावर वनडे वर्ल्ड कप जिंकलो नाही, याची नाराजी स्पष्ट दिसत होती.
दरम्यान, आयसीसीने मंगळवारी 2026 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये गतविजेत्या भारताला पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे.
