सामन्यात आत्तापर्यंत काय घडलं?
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघासाठी योग्य ठरला नाही आणि संघ पहिल्या डावात 135 धावांवर बाद झाला. कांगारू संघाकडून विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स ली यंगने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यश देशमुखने 22 धावा आणि विल मलाझुकने 10 धावांचे योगदान दिले. संघातील उर्वरित 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारताकडून खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर उद्धव मोहनने 2 आणि दीपेश द्रवेंद्रनने १ विकेट घेतली.
advertisement
भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही
कर्णधार आयुष म्हात्रे 8 धावांवर बाद झाला. भारताची सुरुवातही फारशी चांगली नव्हती. संघाने 17 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर विहान मल्होत्रा 11 धावांवर बाद झाला. दुसरी विकेट 18 धावांवर पडली. आता कर्णधार आयुष म्हात्रे 8 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी 20 धावांवर, राहुल कुमार 9 धावांवर, वेदांत त्रिवेदी 25 धावांवर, हरवंश पंगालिया 1 धावांवर आणि खिलन पटेल 26 धावांवर बाद झाले. हेनिल पटेल (22) आणि दीपेश द्रवेंद्रन (6) नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून केसी बार्टनने आतापर्यंत 3 बळी घेतले. विल बायरमने 2 बळी घेतले. चार्ल्स लॅचमंड आणि ज्युलियन ऑसबोर्न यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.