10 मिनिटांची एक खास फिल्म
सूर्याने सांगितलं की, टीमच्या व्हिडिओ अनालिस्टने 10 मिनिटांची एक खास फिल्म तयार केली होती. यामध्ये गेल्या 2 वर्षांतील खेळाडूंच्या प्रवासातील सर्व महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण गुंफण्यात आले होते, ज्यामुळे खेळाडू पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींत रमले. या फिल्ममध्ये वापरण्यात आलेल्या गाण्यांनी खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह भरला होता. 'बाहुबली' सिनेमातील गाणी आणि अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील 'ओ शेरा' या गाण्यांचा यात समावेश होता. ही गाणी ऐकताना खेळाडूंच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि प्रत्येक विजयाचा आनंद पुन्हा एकदा ताजा झाला.
advertisement
पडद्यामागील मेहनत फिल्मच्या माध्यमातून समोर
टीममधील प्रत्येक सदस्यासाठी हा भावनिक क्षण होता. मैदानावर गाजवलेले शौर्य आणि पडद्यामागील मेहनत या फिल्मच्या माध्यमातून समोर आली. विजयाच्या या प्रवासात केवळ रन आणि विकेट महत्त्वाच्या नसून, एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि एकमेकांना दिलेला आधारही तितकाच मोलाचा असल्याचं यातून अधोरेखित झालं. टीम इंडिया त्यानंतर खचून गेली नाही तर अधिक जोमाने खेळली.
IPL 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी गुड न्यूज, महेंद्रसिंग धोनीला अखेर BCCI कडून क्लिन चीट!
तुम्ही 100 बायलॅटरल मॅचेस जिंकल्या असतील तर...
दरम्यान, फायनलपूर्वी गंभीरचं एक वाक्य टीम इंडियाच्या कामी आलं. तुम्ही 100 बायलॅटरल मॅचेस जिंकल्या असतील तर त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही एक वर्ल्ड कप जिंकला तर फरक पडतो, असं गंभीर म्हणाला होता. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला फायनलमध्ये भारी पडू दिलं नाही अन् सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
