प्रसाद यांच्या संघाने त्यांच्या जाहीरनाम्यात आणि पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की ते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेट परत आणण्यासाठी सक्रियपणे काम करतील, जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जेतेपदाच्या सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आंतरराष्ट्रीय सामने निलंबित करण्यात आले आहेत.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि केएससीएचे आजीवन सदस्य डी.के. शिवकुमार यांनीही मतदान करण्यासाठी स्टेडियमला भेट दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही चिन्नास्वामी स्टेडियममधून आयपीएलचे सामने हलवू देणार नाही. ही बंगळुरू आणि कर्नाटकसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आम्ही येथे आयपीएलचे सामने आयोजित करण्याची खात्री करू. मी क्रिकेटप्रेमी आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि स्टेडियमची प्रतिष्ठा राखली जाईल याचीही आम्ही खात्री करू. आम्ही एक पर्यायी नवीन क्रिकेट स्टेडियम देखील बांधू.'
advertisement
आयपीएल 2026 मधले आरसीबीचे सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्येच होतील, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी दिली आहे. 4 जून रोजी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणत्याच सामन्यांचं आयोजन केलं गेलं नाही. महिला वर्ल्ड कपचे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारे सामनेही नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये झाले, त्यामुळे आयपीएलचे आरसीबीचे सामने बंगळुरूमध्ये होणार का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे सस्पेन्स संपला आहे.
आरसीबीने 2025 मध्ये पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यानंतर 4 जूनला चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला तर 56 जण जखमी झाले.
