TRENDING:

IND W vs AUS W : नवी मुंबईतील मॅचसाठी धोक्याचा इशारा, सेमीफायनल कशी पार पडणार, रिझर्व्ह डे आहे का?

Last Updated:

पहिली सेमीफायनल ही इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका संघात 29 नोव्हेंबपरला पार पडणार आहे तर दुसरा फायनल सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात 30 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India W vs Australia W : आयसीसी वुमेन्स वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतले सगळे सामने संपुष्ठात आले आहे. आता थेट चार संघात सेमी फायनलच्या लढती होणार आहेत.पहिली सेमीफायनल ही इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका संघात 29 नोव्हेंबपरला पार पडणार आहे तर दुसरा फायनल सामना हा भारत आणि
womens world cup 2025
womens world cup 2025
advertisement

ऑस्ट्रेलिया या संघात 30 ऑक्टोबरला पार पडणार आहे. पण फानयल सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर मॅचचा निकाल कसा लागणार? रिझर्व्ह डे चा पर्याय आहे का? हे जाणून घेऊयात.

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेला महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेत पावसामुळे सतत व्यत्यय आणला आहे. पाच सामने वाया गेले आहेत आणि अनेक सामने पूर्ण 50 षटकांसाठी खेळवता आले नाहीत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटच्या लीग टप्प्यातील सामन्यातही अशीच परिस्थिती दिसून आली.त्यामुळे जर सेमी फायनल सामन्यात पाऊस पडला तर निकाल कसा लागणार?असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

advertisement

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीत आमनेसामने येतील. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील. गुवाहाटीत हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, परंतु नवी मुंबईत पाऊस हानी पोहोचवू शकतो. म्हणूनच, नॉकआउट सामन्यांसाठी राखीव दिवसाचा नियम काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रिझर्व्ह डे चा नियम?

advertisement

महिला क्रिकेट विश्वचषक ही आयसीसी स्पर्धा आहे आणि आयसीसीने आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये लीग टप्प्यात राखीव दिवस नसतात. उलट, नॉकआउट सामन्यांमध्ये राखीव दिवस हा नियम आहे. याचा अर्थ असा की 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी देखील राखीव दिवस असेल. राखीव दिवसाचा नियम असा आहे की सामने पहिल्या दिवसाच्या शेवटी दुसऱ्या दिवशी सुरू होतील. 2019 चा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुरुष विश्वचषक उपांत्य फेरी राखीव दिवशी संपली.

advertisement

सामना रद्द झाला तर काय

पहिला उपांत्य सामना २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि जर पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर ३० ऑक्टोबर या सामन्यासाठी राखीव असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामना ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि जर त्या दिवशी निकाल लागला नाही, तर ३१ ऑक्टोबर राखीव ठेवण्यात आला आहे. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

advertisement

राखीव दिवशीही पाऊस पडला तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

जर राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जातो. उदाहरणार्थ, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरी राखीव दिवशी पूर्ण झाली नाही, तर इंग्लंड अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, कारण लीग टप्प्याच्या शेवटी इंग्लंड पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर राहिला. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठीही असेच होऊ शकते.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs AUS W : नवी मुंबईतील मॅचसाठी धोक्याचा इशारा, सेमीफायनल कशी पार पडणार, रिझर्व्ह डे आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल